शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विजेची कामे लागली मार्गी

By admin | Updated: January 20, 2016 01:24 IST

महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पनेमुळे बारामती मंडलातील वीज यंत्रणेसंबंधीच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे

बारामती : महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पनेमुळे बारामती मंडलातील वीज यंत्रणेसंबंधीच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे. मंडलामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुमारे दीड हजाराहून अधिक कामे झाली आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना गावोगावी वीज पोहोचली. अनेक गावांत तीस ते चाळीस वर्षे जुनी यंत्रणा आहे. कमकुवत तारा, झिजलेले खांब, उघडे फ्यूज बॉक्स यामुळेच ग्रामीण भागात विद्युत अपघाताच्या घटनांचा धोका वाढला होता. शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे ऊस जळाल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली.याबाबत सातत्याने महावितरणकडे तक्रारी होत होत्या. वाढत्या तक्रारी आणि समस्यांची गंभीर दखल घेत महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पना राबबून त्या गावातील वीज यंत्रणेसंबंधीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती मंडलात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर, शिरूर, पुरंदर आदी तालुक्यांत कामे सुरू आहेत. या मोहिमेत रोहित्राच्या पेट्या दुरुस्त करणे, किटकॅट, वीज खांब बदलणे, सैल वीजवाहिन्यांचे गाळे ओढणे, उच्च दाब वाहिनीस तसेच लघुदाब वाहिनीस गार्डिंग करणे, नादुरुस्त मीटर बदलणे, कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या ग्राहकांची पडताळणी करणे, शून्य ते तीस युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांची तसेच मीटर रीडिंग उपलब्ध नसलेल्या ग्राहकांची तपासणी करणे, वीजचोरी व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे उघडकीस आणणे, वीजबिलाची थकबाकी वसूल करणे, वाहिन्यांच्या गाळ््यांना स्पेसर बसविणे, लघुदाब वाहिनीस जंपरिंग करणे, रोहित्र बदलणे, नवीन वीजजोड देणे, वीजवाहक तारा बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती करणे आदी कामे यांमधून करण्यात येत आहेत.या मोहिमेत अधीक्षक अभियंता केशव सदाकळे, कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, मदन शेवाळे, शिवाजी वायफळकर यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते व जनमित्रांनी सहभाग घेतला.