शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केशवनगर भागात विजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

केशवनगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. अगदी सकाळच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच ...

केशवनगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. अगदी सकाळच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच केशवनगर भागास एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात उन्हाळाही आहे. हा पाणीपुरवठा सकाळच्या वेळेतच होत असतो. नेमके याच वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पाणी भरणे अवघड होऊन बसले आहे.

तसेच केशवनगर भागात अनेक वर्कर वर्क फ्रॉम होम शिपमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे संगणक चालू करण्यासाठी विजेचीच गरज असते. वीजपुरवठा खंडित झाल्यावर येथील नागरिक महावितरणच्या मुंढवा केशवनगर भागासाठी नेमण्यात आलेले कर्मचाऱ्यांना संपर्क केल्यास हा क्रमांक कायमच बिझी, नाहीतर बंद अशा अवस्थेत असतो. परिणामी नागरिक उपकार्यकारी अभियंता तसेच अतिरिक्त अभियंता यांच्याशी संपर्क साधतात.

मात्र, त्यांना हे अधिकारी अतिशय अरेरावीच्या भाषेत उत्तरे देत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तरी येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी चिन्मय वाईकर यांनी केली आहे. तसेच या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता आंदोलनच करावे लागेल, असा इशारा या भागातील नागरिक सोमनाथ गायकवाड यांच्यासह इतर नागरिकांनी दिला आहे.

यासंदर्भात महावितरण विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.