शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

केशवनगर भागात विजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

केशवनगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. अगदी सकाळच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच ...

केशवनगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. अगदी सकाळच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच केशवनगर भागास एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात उन्हाळाही आहे. हा पाणीपुरवठा सकाळच्या वेळेतच होत असतो. नेमके याच वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पाणी भरणे अवघड होऊन बसले आहे.

तसेच केशवनगर भागात अनेक वर्कर वर्क फ्रॉम होम शिपमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे संगणक चालू करण्यासाठी विजेचीच गरज असते. वीजपुरवठा खंडित झाल्यावर येथील नागरिक महावितरणच्या मुंढवा केशवनगर भागासाठी नेमण्यात आलेले कर्मचाऱ्यांना संपर्क केल्यास हा क्रमांक कायमच बिझी, नाहीतर बंद अशा अवस्थेत असतो. परिणामी नागरिक उपकार्यकारी अभियंता तसेच अतिरिक्त अभियंता यांच्याशी संपर्क साधतात.

मात्र, त्यांना हे अधिकारी अतिशय अरेरावीच्या भाषेत उत्तरे देत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तरी येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी चिन्मय वाईकर यांनी केली आहे. तसेच या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता आंदोलनच करावे लागेल, असा इशारा या भागातील नागरिक सोमनाथ गायकवाड यांच्यासह इतर नागरिकांनी दिला आहे.

यासंदर्भात महावितरण विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.