आंबेठाण : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वीज वितरणसाठी असणाऱ्या तारांची खेड तालुक्यात दुरवस्था झाली आहे. हात लागेल अशा अंतरावर या तारा लोंबकळत असल्याने दुर्घटना घडू नयेत, म्हणून नागरिकांनाच ठिकठिकाणी स्वत:हून लाकडाचा टेकू द्यावा लागत आहे. वीज वितरणला वारंवार कल्पना देऊनही त्यांच्याकडून याबाबत कार्यवाही होत नसल्याने सर्वसामान्य आणि प्रशिक्षण नसणाऱ्या नागरिकांनाच असे काम करावे लागत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.वीज वितरण करणाऱ्या तारांना झोळ पडल्याने त्या अगदी हात पोहोचेल अशा अंतरावर आल्या आहेत. अनेक वेळा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील त्यांच्याकडून या गंभीर बाबीची दखल घेतली जात नाही. यामुळे सुरक्षा म्हणून नागरिकच या लोंबकळणाऱ्या तारांना संबंधित प्रशासन दखल घेत नाही, म्हणून स्थानिक पातळीवर अनेक वेळा नागरिकच सुरक्षेचा उपाय म्हणून या तारांना लाकडी टेकू लावत आहे. अनेक वेळा अनुभव नसताना किंवा सुरक्षेची साधने उपलब्ध नसताना जीव धोक्यात घालून असे करणे भाग पडत आहे. नागरिकांच्या वतीने अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना लोंबकळत असणाऱ्या तारा ओढून पुन्हा ताठ किंवा पूर्ववत कराव्या, असे साकडे घातले असता त्यांच्याकडून कार्यवाही केली जात नाही, म्हणून अनेक वेळा स्थानिक नागरिकांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे आणि उंच लाकडे वापरून त्या तारांना टेकू द्यावा लागत आहे. (वार्ताहर)
विजेच्या तारांना ‘टेकू’
By admin | Updated: January 23, 2017 02:40 IST