शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीजपंप जळाले; शेतीला पाणीही मिळेना

By admin | Updated: May 13, 2017 04:16 IST

चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत. वीजवाहक तारा जमिनीवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत. वीजवाहक तारा जमिनीवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. नारायणवाडी, शेटे मळा, पाटे खैरे मळा परिसरातील वीजपुरवठा (दि. ३०) पासून बंद पडला आहे. गेल्या ५ दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होऊन शेतीमालाचे नुकसान होत आहे. वीजपुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतीपंप जळाले आहेत. पाणी असूनही शेतीला पाणी मिळत नसल्याने पिके पाण्याअभावी जळत आहे. दररोज वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित केला जातो. अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी करून वीज वितरणच्या कारभाराचे वाभाडे ग्राहकांनी काढले. दरम्यान, येत्या दोन दिवसांत खंडित असलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन नारायणगाव विभाग वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता उमेश कर्पे यांनी नारायणगाव येथे दिले . किसान क्रांती शेतकरीबांधव तालुका संघटनेच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर त्याची दखल घेत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी शेतकऱ्यांना आंदोलन न करता वीज वितरणचे अधिकारी यांच्याशी या निवेदनातील मुद्द्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक बोलविण्याची विनंती केली. त्यानुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात झालेल्या सभेत वीज ग्राहकांनी तक्रारीचा पाढा वाचून दाखविला. या वेळी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता उमेश कर्पे, सहायक अभियंता शेंडकर यांनी ग्राहकांची तक्रार समजून घेतली. याप्रसंगी सध्या असलेला वीज खंडित पुरवठा संबंधित प्रलंबित सर्व प्रश्नाबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.या वेळी नारायणवाडी येथील मुख्य रस्त्यावर वीजवाहक तार खाली आल्याने मोठी वाहने ये-जा करताना मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. वायरमन कामचुकारपणा करतात. वीजसंदर्भात संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बंद पडलेला विद्युत पुरवठा वेळेवर सुरळीत करीत नाहीत. वायरमन शेतकऱ्यांच्या संपर्कात नसतात. वारवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा अनेक तक्रारी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केल्या.