शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

एकवीरा गडाची वाट बिकट पावसामुळे पायऱ्यांचा भराव गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:48 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या गडाच्या पायºया पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मार्ग धोकादायक झाला आहे. अनेक वर्षापासून भारतीय पुरातत्त्व विभागाने गडाच्या पायºया व सुरक्षा भिंतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे देवीच्या गडावर जाण्याचा प्रवास धोकादायक झाला आहे.

लोणावळा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या गडाच्या पायºया पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मार्ग धोकादायक झाला आहे. अनेक वर्षापासून भारतीय पुरातत्त्व विभागाने गडाच्या पायºया व सुरक्षा भिंतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे देवीच्या गडावर जाण्याचा प्रवास धोकादायक झाला आहे.कोळी, आग्री समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामीनी आई एकवीरेचे मंदिर व बुद्धकालीन कार्ला लेणी वेहेरगावात आहे. ऊन, वारा, पावसामुळे या लेणी परिसराच्या सुरक्षा भिंती व पायºया ठिसूळ होऊन ढासळू लागल्या आहेत. मागील तीन वर्षात चार वेळा गडावर दरड कोसळण्याचे प्रकार घडले असून सुरक्षा भिंती पडल्यामुळे गडावर फिरणे धोकादायक झाले आहे. पायºयांचा भराव खचल्याने चालणे मुश्किल झाले आहे. पाच पायरी मंदिराच्या खालील बाजूला पायरीचा केवळ एक दगड शिल्लक राहिला असून भराव खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. लेणीच्या पायºयाही दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून तुटल्याने बंद केल्या आहेत. भाविकांकडून लेणी पाहण्यासाठी पैसे घेणारे पुरातत्त्व खाते कामांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याने पुरातन वास्तू नामशेष होऊ लागल्या आहेत. महिनाभरात देवीच्या गडावर शारदीय नवरात्रो उत्सवाला सुरुवात होणार आहे. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येणार असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने गडाच्या पायºया दुरुस्त कराव्यात, अशी मागणी वेहेरगावातील गणेश पवार, संदीप देशमुख, प्रवीण देशमुख, दीपक देशमुख व ग्रामस्थांनी केली आहे.सर्वत्र नाराजीवेहेरगावातील सामाजिक कार्यकर्ते व मनविसेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी गडाच्या पायºयांची छायाचित्रे व निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना दिले आहे. एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे व शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी भारतीय पुरातत्त्वचे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले असताना देखील पुरातत्त्व विभाग या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.आंदोलनाचा इशारा४कार्ला फाटा, गड पायथा व गडावर जाणारा मार्ग या सर्वच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून पाण्याची डबकी तयार झाली आहेत. वारंवार तक्रारी व आंदोलन करून देखील मावळचे सार्वजनिक बांधकाम विभाग कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने दर पावसात वेहेरगाव व दहिवली ग्रामस्थांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवरात्रीपूर्वी रस्ते दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनचा इशारा नागरिकांनी दिला आहे.