शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचरा संकलनासाठी उभारली सक्षम यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:10 IST

पुणे - देशातील प्रमुख आयटी हबपैकी एक असलेल्या पुण्याचा इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होणाऱ्या दहा शहरांमध्येही समावेश असल्याने ई-कचरा संकलनासाठी ...

पुणे - देशातील प्रमुख आयटी हबपैकी एक असलेल्या पुण्याचा इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होणाऱ्या दहा शहरांमध्येही समावेश असल्याने ई-कचरा संकलनासाठी महापालिकेने शहरात १३ कायमस्वरूपी केंद्रे सुरू केली आहेत. त्याद्वारे गेल्या चार वर्षांत शहरातील १५७ टन ई-कचरा संकलित करून प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे टीव्ही, संगणक, मोबाईल, लॅपटॉप आणि त्यांचे चार्जर्स अशा अनेक वस्तू असतात. हे सगळे खराब झाले, की तसेच टाकून दिले जाते. अशा प्रकारे साचणाऱ्या इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ई-कचऱ्याची समस्या जगभर उभी ठाकली आहे. ई-कचरा निरुपद्रवी दिसत असला, तरी त्यात पर्यावरणासाठी अनेक घातक घटक असतात. त्यामुळेच घरातील रोजच्या कचऱ्र्यासोबतच या वस्तू फेकल्याने होणारे घातक प्रदूषण टाळण्यासाठी व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेने धोरण निश्चित करून योजनबद्ध प्रयत्न केले आहेत. शहरात दरमहा सरासरी तीन टनांहून अधिक इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो. तो संकलित करण्यासाठी आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ई-कचरा स्वीकारण्याची सुविधा आहे. गेल्या चार वर्षांत १३ कायमस्वरूपी 'ई-कचरा संकलन केंद्रे' सुरू केली आहेत. याशिवाय २१ केंद्रांद्वारे महिन्यातून एकदा ई-कचरा गोळा केला जातो. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्याआणि प्रकल्पांमधून ई-कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेतर्फे महिन्यातून आठ ते दहा वेळा मोहीम राबविली जाते. या कामात 'पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन', 'जनवाणी', 'कमिन्स'सारख्या संस्था महापालिकेला साहाय्य करतात. शहरातून गोळा झालेला सर्व ई-कचरा 'महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळा'कडे प्रक्रियेसाठी पाठविला जातो. इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्यासाठी 'स्वच्छ' या संस्थेसह पुणे महापालिकेने एक फिरते केंद्र सुरू केले. तसेच या कचऱ्र्याचे वाढते प्रमाण पाहता महापालिकेच्या विविध आरोग्य कोठ्यांमध्ये आणि वॉर्ड कार्यालयांमध्येही ई-कचरा स्वीकारण्यात येतो.

----------------------------

ई-कचरा धोकादायक का?

मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, रिमोट, रेडिओ, बॅटरी इत्यादी रोजच्या वापरातील गोष्टी आपण कालांतराने फेकून देतो. या ई-कचऱ्यामध्ये असलेला पारा, शिसे आणि कॅडमियमसारख्या घटकांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. या कचऱ्र्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने न लावल्यास जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित होते. हे रोखण्यासाठी नागरिकांकडील ई-कचरा जमा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने यंत्रणा निर्माण केली आहे.

------------------------

सातत्याने वाढणारा ई-कचरा गोळा करण्यासाठीची भक्कम व्यवस्था महापालिकेने आता उभारली आहे. महापालिकेकडे ई-कचराजमा करण्याचे दिवस वाढविले आहेत आणि त्यात स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. यामुळे पुण्यात ई-कचरा जमा करण्याचे एक चांगले मॅाडेल उभे राहिले आहे.

- गणेश बिडकर, सभागृह नेता

-----------