शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

अबाधित बंधुतेसाठी शिक्षण हेच अवजार

By admin | Updated: January 18, 2015 01:30 IST

राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे.

पुणे : राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे. सरकारने समतेवर आधारलेल्या राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा नियोजनपूर्वक वापर केला पाहिजे, असे डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सांगितले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने १६वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, भाई वैद्य, अ‍ॅड. प्रमोद गुजर, प्रकाश रोकडे, डॉ. विकास आबनावे, शंकर आथरे, डॉ. भीम गायकवाड, महेंद्र भारती उपस्थित होते. या वेळी अशोक विद्यालयापासून संमेलनस्थळापर्यंत राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. विविध वर्तमानपत्रांप्रमाणे बंधुता ही या संमेलनाची भाषा आहे. ही भेदाची नाही तर शांतीची, फाडण्याची नाही तर जोडण्याची भाषा आहे, असे रोकडे म्हणाले. आपण जोवर एकमेकांशी मराठीत बोलत आहोत, तोवर मराठी भाषा संपणार नाही; परंतु बंधुतेच्या भाषेची चिंता आहे. आज बंधुतेवर साहित्य लिहिण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. बंधुतेशिवाय काही जवळचे नसते. त्या बंधुतेच्या प्रेरणेतूनच सहकार्य मिळते, असे मत स्वागताध्यक्ष गुजर यांनी व्यक्त केले. अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘खरा तो एकचि धर्म’ गीत सादर केले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)४कायदा-सुव्यवस्था ही केवळ सार्वजनिक शांततेच रक्षण करणारी फौज नव्हे, तर जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या मानवाधिकाराची राखण करणारी संवेदनक्षम आणि पारदर्शी यंत्रणा बनली पाहिजे. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा आणि विहारांमधून सामाजिक समतेच्या प्रार्थना झाल्या पाहिजेत. ही राष्ट्रउभारणीची खरी पायवाट आहे, असे लिंबाळे यांनी सांगितले.