शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अबाधित बंधुतेसाठी शिक्षण हेच अवजार

By admin | Updated: January 18, 2015 01:30 IST

राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे.

पुणे : राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे. सरकारने समतेवर आधारलेल्या राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा नियोजनपूर्वक वापर केला पाहिजे, असे डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सांगितले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने १६वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, भाई वैद्य, अ‍ॅड. प्रमोद गुजर, प्रकाश रोकडे, डॉ. विकास आबनावे, शंकर आथरे, डॉ. भीम गायकवाड, महेंद्र भारती उपस्थित होते. या वेळी अशोक विद्यालयापासून संमेलनस्थळापर्यंत राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. विविध वर्तमानपत्रांप्रमाणे बंधुता ही या संमेलनाची भाषा आहे. ही भेदाची नाही तर शांतीची, फाडण्याची नाही तर जोडण्याची भाषा आहे, असे रोकडे म्हणाले. आपण जोवर एकमेकांशी मराठीत बोलत आहोत, तोवर मराठी भाषा संपणार नाही; परंतु बंधुतेच्या भाषेची चिंता आहे. आज बंधुतेवर साहित्य लिहिण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. बंधुतेशिवाय काही जवळचे नसते. त्या बंधुतेच्या प्रेरणेतूनच सहकार्य मिळते, असे मत स्वागताध्यक्ष गुजर यांनी व्यक्त केले. अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘खरा तो एकचि धर्म’ गीत सादर केले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)४कायदा-सुव्यवस्था ही केवळ सार्वजनिक शांततेच रक्षण करणारी फौज नव्हे, तर जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या मानवाधिकाराची राखण करणारी संवेदनक्षम आणि पारदर्शी यंत्रणा बनली पाहिजे. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा आणि विहारांमधून सामाजिक समतेच्या प्रार्थना झाल्या पाहिजेत. ही राष्ट्रउभारणीची खरी पायवाट आहे, असे लिंबाळे यांनी सांगितले.