शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

बनावट डिग्रीचा व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्याने शिक्षणाची वाट लागली-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:50 IST

सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत.

पुणे : सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत. शिक्षकांकडे, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. बनावट डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेताही जोरदार टीका केली.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित बाबूराव घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण, महापालिकेतील नेते चेतन तुपे, बाबूराव चांदेरे, जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, राजेंद्र घाडगे, मोहन देशमुख आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शिक्षकांची भरती बंद आहे, बीपीएडची तर वाट लागलीय, मानधन प्रलंबित आहे. मुंबई विद्यापीठाचा अद्याप निकाल नाही. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचे अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याची टीका पवार यांनी केली. शिक्षक पुरस्कार वेळेवर दिले जात नाहीत, गरिबांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीवर मंत्र्यांच्या मुलांना परेदशात शिक्षणासाठी पाठवले जाते, अभ्यासक्रमात कुठला धडा असावा, तसेच कुठला नसावा, कोणाला वगळावं, वगळू नये यामध्ये हस्तक्षेप सुरू आहे.शिक्षणाबाबतची तक्रार कोणाकडे करायची, हा प्रश्न पडलेला आहे. सरकारकडून शिक्षणाची थट्टा सुरू असून सरकार सरसकट शिक्षण संस्थांना दरोडेखोर म्हणून शिक्षणाचा अपमान करीत आहे. तसेच शिक्षण विभागाने दहा लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायचे असे सांगितले. मात्र, एक दिवस फुटबॉल खेळून राज्य फुटबॉलमय होणार आहे का,’’ असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.