शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बनावट डिग्रीचा व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्याने शिक्षणाची वाट लागली-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:50 IST

सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत.

पुणे : सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत. शिक्षकांकडे, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. बनावट डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेताही जोरदार टीका केली.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित बाबूराव घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण, महापालिकेतील नेते चेतन तुपे, बाबूराव चांदेरे, जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, राजेंद्र घाडगे, मोहन देशमुख आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शिक्षकांची भरती बंद आहे, बीपीएडची तर वाट लागलीय, मानधन प्रलंबित आहे. मुंबई विद्यापीठाचा अद्याप निकाल नाही. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचे अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याची टीका पवार यांनी केली. शिक्षक पुरस्कार वेळेवर दिले जात नाहीत, गरिबांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीवर मंत्र्यांच्या मुलांना परेदशात शिक्षणासाठी पाठवले जाते, अभ्यासक्रमात कुठला धडा असावा, तसेच कुठला नसावा, कोणाला वगळावं, वगळू नये यामध्ये हस्तक्षेप सुरू आहे.शिक्षणाबाबतची तक्रार कोणाकडे करायची, हा प्रश्न पडलेला आहे. सरकारकडून शिक्षणाची थट्टा सुरू असून सरकार सरसकट शिक्षण संस्थांना दरोडेखोर म्हणून शिक्षणाचा अपमान करीत आहे. तसेच शिक्षण विभागाने दहा लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायचे असे सांगितले. मात्र, एक दिवस फुटबॉल खेळून राज्य फुटबॉलमय होणार आहे का,’’ असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.