शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रात्र शाळांबाबत शिक्षण विभागाची टोलवाटोलवी; दहावी-बारावीच्या परीक्षा द्यायच्या कशा? असंवेदनशीलतेचा गाठला कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 05:47 IST

राज्यातील रात्रशाळांमधून १४५६ शिक्षक जून २०१७ मध्ये तडकाफडकी काढून घेण्यात आले. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी तात्पुरते शिक्षक भरती करण्यासही मान्यता देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. शाळांनी शिक्षणाधिकाºयांकडे सादर केलेल्या प्रस्तावावर त्यांनी उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागितले.

- दीपक जाधवपुणे : राज्यातील रात्रशाळांमधून १४५६ शिक्षक जून २०१७ मध्ये तडकाफडकी काढून घेण्यात आले. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी तात्पुरते शिक्षक भरती करण्यासही मान्यता देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. शाळांनी शिक्षणाधिकाºयांकडे सादर केलेल्या प्रस्तावावर त्यांनी उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागितले, उपसंचालकांनी संचालकांकडे तर संचालकांनी आयुक्तांकडे आणि धक्कादायक म्हणजे शिक्षण आयुक्तांनी शिक्षण सचिवांमध्ये याबाबत काय निर्णय घ्यायचा याचे मार्गदर्शन मागितले आहे. या गोंधळात वर्ष संपले तरी शिक्षक मिळाले नसून आता दहावी-बारावीच्या परीक्षा कशा द्यायच्या असा प्रश्न रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.शासनाने रात्र शाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाव्दारे संपुष्टात आणली. त्यानंतर त्या जागांवर लगेच शासनाने पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अद्याप शासनाने शिक्षक दिले नाहीत. लोकमतने याबाबत एक वृत्तमालिका प्रकाशित करून याला वाचा फोडली होती. त्यानंतर शाळांनी तात्पुरते शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले होते.संचालकांच्या सुचनेनुसार पूना नाईट हायस्कूल, नगरचे भाई सथ्थ्या नाईट हायस्कूल आदी रात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी उपसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे तात्पुरते शिक्षक मिळावेत म्हणून प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावांवर काय निर्णय घ्यावा याबाबत मार्गदर्शन करावे असे पत्र दिनकर टेमकर यांनी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांना दिले. म्हमाणे यांनी त्याच पत्राची कॉपी करून शिक्षण आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे मार्गदर्शन मागितले. त्यावर कडी म्हणजे शिक्षण आयुक्तांनीही त्याच पत्राची कॉपी करून प्रधान सचिवांना पत्र लिहून मार्गदर्शन मागितले आहे.इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांना वर्षभर शिक्षकच उपलब्ध झाले नसल्याने आता दहावी-बारावीचे पेपर कसे सोडवायचे या विंवचनेत विद्यार्थी बुडालेले आहेत. रात्र शाळांमधून शिक्षक काढून घेतल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रात्र शाळेमध्ये समायोजन केले जाईल असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.स्वत:च घेतलेल्या निर्णयांचा अधिकाºयांना पडला विसरमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत तत्कालीन शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर २०१६ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीला सर्व संचालक, विभागीय उपसंचालक उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते.अनुदानित उच्च माध्यमिक शाळांमध्ये घडयाळी तासिका तत्त्वांवरील, रजा कालावधीमधील तसेच अर्धवेळ पदांवरील नियुक्त्या या हंगामी स्वरूपाच्या असतात, त्यामुळे अशा नियुक्त्या करण्यासाठी विभागीय शिक्षण संचालक स्तरावरून परवानगी देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तरीही हेच सगळे अधिकारी आम्हांला मार्गदर्शन करावे म्हणून त्यांच्या वरिष्ठांना पत्र लिहीले आहे.स्वत:च्या मुलांबाबत असे वागणारका ?रात्रशाळांमुळे हॉटेल, गॅरेज, मॉल, दुकाने आदी ठिकाणी काम करणाºया हजारो मुले-मुली पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत झाली. मात्र आता शाळांमध्ये शिक्षकच शिकवायला येत नसल्याने विद्यार्थी रात्र शाळांकडे पाठ फिरवू लागली आहेत. आता परीक्षा कशा द्यायच्या या विवंचनेत ती बुडाली आहे. शिक्षण विभागातील अधिकाºयांची मुले दहावी-बारावी असती तर त्यांना महागडया कोचिंग क्लासेसपासून सर्व सेवा सुविधा साहजिकच त्यांनी पुरविल्या असत्या. मग रात्र शाळांमधील या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत ते हेळंसाड का करीत आहेत अशी विचारणा स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :Puneपुणे