शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

शिक्षण विभागाने दडविला शिक्षणाधिकारी भरती घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2015 00:47 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याबाबत तसेच

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याबाबत तसेच शासनास खोटी माहिती देऊन नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळवल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवांनी शिक्षण आयुक्त व माध्यमिक शिक्षण संचालकांकडे या संदर्भातील अहवाल मागविला होता. मात्र, आयुक्त कार्यालयाकडून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे शिक्षण विभागच या भरती प्रक्रियेचा घोटाळा दडवत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.नोव्हेंबर २0१0 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षणाधिकारी व तत्सम पदाच्या भरतीसाठी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. मात्र, बहुतांश उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविली असल्याची तक्रार डी. के. गुंजाळ यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यावर राज्याचे उपसचिव आर. पी. आटे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून संबंधित उमेदवारांची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले तरीही माध्यमिक शिक्षण विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.एमपीएससीकडे ३२ उमेदवारांनी चुकीची व खोट्या माहितीच्या आधारे तयार केलेली नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केली असल्याचा दावा गुंजाळ यांनी केला आहे. तसेच मागासवर्गीय गटातील उमेदवारांना खुल्या गटातील राखीव जागांमधून नियुक्ती मिळाली आहे. परिणामी खुल्या गटातील गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होत आहे, असे पत्र गुंजाळ यांनी मुख्यमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्याकडे दिले आहे.आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची तपासणी न करता या उमेदवारांना संबंधित पदावर नियुक्ती देण्याबाबत शासनाकडे शिफारस केली जाते. तसेच शासनाकडूनही या उमेदवारांच्या कागदपत्रांची तयासणी केली जात नाही. परिणामी खोटी प्रमाणपत्र सादर करून उमेदवार नोकरीत रुजू होत असल्याचे गुंजाळ यांनी केलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे.