शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाने दडविला शिक्षणाधिकारी भरती घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2015 00:47 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याबाबत तसेच

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याबाबत तसेच शासनास खोटी माहिती देऊन नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळवल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवांनी शिक्षण आयुक्त व माध्यमिक शिक्षण संचालकांकडे या संदर्भातील अहवाल मागविला होता. मात्र, आयुक्त कार्यालयाकडून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे शिक्षण विभागच या भरती प्रक्रियेचा घोटाळा दडवत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.नोव्हेंबर २0१0 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षणाधिकारी व तत्सम पदाच्या भरतीसाठी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. मात्र, बहुतांश उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविली असल्याची तक्रार डी. के. गुंजाळ यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यावर राज्याचे उपसचिव आर. पी. आटे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून संबंधित उमेदवारांची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले तरीही माध्यमिक शिक्षण विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.एमपीएससीकडे ३२ उमेदवारांनी चुकीची व खोट्या माहितीच्या आधारे तयार केलेली नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केली असल्याचा दावा गुंजाळ यांनी केला आहे. तसेच मागासवर्गीय गटातील उमेदवारांना खुल्या गटातील राखीव जागांमधून नियुक्ती मिळाली आहे. परिणामी खुल्या गटातील गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होत आहे, असे पत्र गुंजाळ यांनी मुख्यमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्याकडे दिले आहे.आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची तपासणी न करता या उमेदवारांना संबंधित पदावर नियुक्ती देण्याबाबत शासनाकडे शिफारस केली जाते. तसेच शासनाकडूनही या उमेदवारांच्या कागदपत्रांची तयासणी केली जात नाही. परिणामी खोटी प्रमाणपत्र सादर करून उमेदवार नोकरीत रुजू होत असल्याचे गुंजाळ यांनी केलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे.