शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अर्थव्यवस्था बळकट होईल

By admin | Updated: June 10, 2017 02:20 IST

आपण इतर देशांवर अवलंबून असून साधनसामग्री आयात करतो. मेक इन इंडियाच्या चळवळीत अंटार्क्टिका महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आपण इतर देशांवर अवलंबून असून साधनसामग्री आयात करतो. मेक इन इंडियाच्या चळवळीत अंटार्क्टिका महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. अंटार्क्टिकाबाबत जागृती वाढण्याची गरज असून माध्यमांनी या विषयावर सातत्याने प्रकाश टाकला पाहिजे. अंटार्क्टिकाशी संबंध प्रस्थापित करुन भारतीय अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.पहिले भारतीय अंटार्क्टिक स्टेशन दक्षिण गंगोत्री येथे स्टेशन कमांडर म्हणून नेतृत्व केलेल्या लेफ्टनंट कर्नल डॉ. जगदीश खाडिलकर लिखित ‘अंटार्क्टिका - द फ्रोझन काँटिनेंटस एनव्हायर्नमेंट चेंजिंग लॉजिस्टिक्स टू इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे उपस्थित होते. ब्लूम्सबरी पब्लिशिंग इंडिया लिमिटेड या संस्थेने पुस्तक प्रकाशित केले आहे.गोखले म्हणाले, ‘अंटार्क्टिका खंडावरील हालचाली योग्य नाहीत. भारताचे तेथील अस्तित्व महत्त्वाचे आहे. अंटार्क्टिकाकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास त्याचा सुरक्षेच्या दृष्टीने देशाला फायदा होऊ शकतो. अंटार्क्टिका येथील मासे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तैवानसारखे अनेक देश या जोरावर आपली अर्थव्यवस्था बळकट करत आहेत. अंटार्क्टिका हे भारतापासून ३० हजार किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याकडील मान्सूनच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे.’मेधा रबडे यांनी सूत्रसंचालन केले. ललिता मराठे यांनी आभार मानले.