शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पर्यावरणपूरक विसर्जनाला शासनाकडूनच हरताळ, शिक्षण विभागाचा फतवा, विद्यार्थ्यांच्या सहभागी होण्यावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:32 IST

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

- दीपक जाधव ।पुणे : महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लगेच या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.औरंगाबाद खंडपीठाने एका याचिकेवर निर्णय देताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यास राज्य शासनाला सांगितले होते. त्यानुसार तत्कालीन आघाडी सरकारने हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय पातळीवर स्वीकारला होता.मात्र पुणे उच्च शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या एका आदेशामुळे याला मोठा धक्का बसला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक विजय नारखेडे यांना २८ आॅगस्ट रोजी हिंदू जनजागृती समितीने एक पत्र दिले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील तरुण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी, अशी मागणी होती. सहसंचालकांनी लगेच, महाविद्यालयांनी या पत्रानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश काढले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सहसंचालकांचे हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनीही विद्यार्थ्यांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे निर्देश विद्यार्थी कल्याण मंडळ संचालकांच्या स्वाक्षरीने सर्व महाविद्यालयांना दिले.- एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरच्या गणपतीचे मुलीच्या हस्ते पर्यावरणपूरक विसर्जन करून चांगला संदेश दिला असताना शिक्षण विभागाकडून त्याविरोधात कृती करण्यात आली आहे. ‘आॅनलाइन लोकमत’वर शनिवारी दुपारी याबाबतचे वृत्त सर्वांत पहिल्यांदा ब्रेक करण्यात आले. त्यानंतर याचे जोरदार पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.अधिका-यांची चौकशी करून कारवाई व्हावीऔरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हा कार्यक्रम स्वीकारला असताना शिक्षण विभागातील एखादा अधिकारी त्याविरोधात परस्पर आदेश काढत असेल तर हे गंभीर आहे.- हमीद दाभोलकर, सरचिटणीस, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे धार्मिकतेशी विसंगत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यापासून थांबवावे असे पत्र हिंदू जनजागृती समितीने दिले होते. त्यानुसार तपासून कार्यवाही करावी, असे पत्र काढण्यात आले आहे.- विजय नारखेडे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग