शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पर्यावरणपूरक विसर्जनाला शासनाकडूनच हरताळ, शिक्षण विभागाचा फतवा, विद्यार्थ्यांच्या सहभागी होण्यावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:32 IST

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

- दीपक जाधव ।पुणे : महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लगेच या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.औरंगाबाद खंडपीठाने एका याचिकेवर निर्णय देताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यास राज्य शासनाला सांगितले होते. त्यानुसार तत्कालीन आघाडी सरकारने हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय पातळीवर स्वीकारला होता.मात्र पुणे उच्च शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या एका आदेशामुळे याला मोठा धक्का बसला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक विजय नारखेडे यांना २८ आॅगस्ट रोजी हिंदू जनजागृती समितीने एक पत्र दिले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील तरुण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी, अशी मागणी होती. सहसंचालकांनी लगेच, महाविद्यालयांनी या पत्रानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश काढले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सहसंचालकांचे हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनीही विद्यार्थ्यांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे निर्देश विद्यार्थी कल्याण मंडळ संचालकांच्या स्वाक्षरीने सर्व महाविद्यालयांना दिले.- एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरच्या गणपतीचे मुलीच्या हस्ते पर्यावरणपूरक विसर्जन करून चांगला संदेश दिला असताना शिक्षण विभागाकडून त्याविरोधात कृती करण्यात आली आहे. ‘आॅनलाइन लोकमत’वर शनिवारी दुपारी याबाबतचे वृत्त सर्वांत पहिल्यांदा ब्रेक करण्यात आले. त्यानंतर याचे जोरदार पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.अधिका-यांची चौकशी करून कारवाई व्हावीऔरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हा कार्यक्रम स्वीकारला असताना शिक्षण विभागातील एखादा अधिकारी त्याविरोधात परस्पर आदेश काढत असेल तर हे गंभीर आहे.- हमीद दाभोलकर, सरचिटणीस, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे धार्मिकतेशी विसंगत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यापासून थांबवावे असे पत्र हिंदू जनजागृती समितीने दिले होते. त्यानुसार तपासून कार्यवाही करावी, असे पत्र काढण्यात आले आहे.- विजय नारखेडे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग