शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

भामा-आसखेडला गाळाचे ग्रहण

By admin | Updated: May 10, 2017 03:48 IST

खास शेतीला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून बांधण्यात आलेल्या भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात सध्या गाळ साचण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : खास शेतीला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून बांधण्यात आलेल्या भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात सध्या गाळ साचण्याचे प्रमाण अधिक आणि पाणीसाठा मात्र कमी होत चालला आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता जरी ८.१४ टीएमसी असली तरी वाढत्या गाळामुळे धरणाच्या साठवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. धरणाचे दोन्ही कालवे पूर्ण झाले असते तर धरणाच्या पाण्यावर ३८ हजार १५४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असते. परंतु कालवे न झाल्याने किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. खेड तालुक्यासह दौंड आणि हवेली तालुक्याला या पाण्याचा फायदा होत असून त्यामुळे तिन्ही तालुक्यांतील जमीन सिंचनाखाली आली आहे. धरण जरी ८.१४ टीएमसी पाण्याच्या क्षमतेचे असले तरी प्रत्यक्षात मात्र एवढा पाणीसाठा होत नाही. कारण धरणाच्या पाण्याचा फुगवटा हा जवळपास २५ किमीपर्यंत आहे. धरणाच्या क्षेत्रात जवळपास ४० किमी अंतरावरून अन् सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून पाणी वाहत येत असते. हे वाहत येणारे पाणी तीव्र उतारावरून वाहत येत असल्याने पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येत असून धरणक्षेत्रात गाळ मोठ्या प्रमाणात साचत चालला आहे. त्यामुळे धरणाची खोली कमी होत असून पात्र उथळ होत आहे. याचा परिणाम साठवणक्षमतेवर झाला आहे. हजारो ब्रास मातीसाठा निघेल, अशी स्थिती सध्या या धरणात आहे.