शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

खेड तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्याने घरांची पडझड, पिकांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST

दावडी, निमगाव, काळुस, रेटवडी, गुळाणी या परिसरात (दि. २१) रोजी संध्याकाळी वादळी वारा सुटल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले. विजेचे ...

दावडी, निमगाव, काळुस, रेटवडी, गुळाणी या परिसरात (दि. २१) रोजी संध्याकाळी वादळी वारा सुटल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले. विजेचे सिमेंटी पोल भुईसपाट झाले. निमगाव येथील कव्हाळा ठाकरवाडी येथे शांताराम धाकू केदारी, भीमराव कुंडलिक पारधी, देवराम धोंडिबा गावडे याच्या घरावरील पत्रे उडाले. तसेच घरांची पडझड झाली आहे. तसेच विजेचे खांबही कोलमडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. रेटवडी येथील सुभाष मुरलीधर रेटवडे यांच्या पोल्ट्री फार्मची वादळी वाऱ्याने भिंत भुईसपाट झाली.गुळाणी येथेही विजेचे खांब भुईसपाट झाले. काळुस येथही काही घरांचे नुकसान झाले आहे.दावडी येथील जाधव-दरा येथेही ३ घरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीचे पत्रे वाऱ्याने उडाले आहे. दावडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील उन्हाळी बाजरी व कारले, कलिंगड या तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी बाजरी वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली. प्रशासनाने युद्ध पातळीवर शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी दावडीचे सरपंच संभाजी आबा घारे, सर्मथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे, निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे, बबनराव शिंदे, सुभाष हिंगे, संतोष शिंदे, याच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

निमगाव येथील कव्हाळा ठाकरवाडी येथे वादळी वाऱ्याने घराचे छत उडून गेले.

दावडी परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले.