शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ई-निविदामधील अट काढून टाकली

By admin | Updated: April 26, 2017 02:57 IST

ई-निविदांमध्ये गोपनीयता रहावी, तसेच कामाचा दर्जा टिकण्यासाठी स्पर्धा व्हावी, यासाठी ई-निविदा प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

बारामती : ई-निविदांमध्ये गोपनीयता रहावी, तसेच कामाचा दर्जा टिकण्यासाठी स्पर्धा व्हावी, यासाठी ई-निविदा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी हाणून पाडला. त्यामुळे बारामती नगरपालिका प्रशासनाने आता ई-निविदांमध्ये घातलेली अट काढून टाकली. त्यामुळे विकास कामांमध्ये स्पर्धा होईल, अशी अपेक्षा व्यक्त बारामती नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या संदर्भात ई-निविदा प्रसिद्ध करताना ठेकेदारांकडून मूळ कागदपत्रे व बयाणा रक्कम भरल्याची पावती प्रशासनाकडून मागितली जाते. त्यामुळे ई-निविदा सादर करण्याचा मूळ उद्देश सफल होत नाही, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संजय संघवी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली. त्यामध्ये ई-निविदा भरल्यानंतर ठेकेदारांकडून मूळ कागदपत्रे व बयाणा रक्कम भरलेल्या पावतीची मूळ पत्र मागितली जाते. त्यानंतर निविदा उघडल्या जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्पर्धा होत नाही. अगोदरच निविदांची माहिती होत असल्याने ठेकेदारांमध्ये देखील ‘रिंग’ होण्याची शक्यता असते. त्यामुळे निविदा उघडण्यापूर्वी घातलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची अट यापुढे काढून टाकावी, अशी मागणी त्यांनी केली. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनाच्या पूर्वी आली नव्हती. त्यामुळे यापुढे ई-निविदा करताना ही त्रुटी दूर केली जाईल, असे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी यावेळी सांगितले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी देखील नगरसेवकांच्या मागणीनुसार ई-निविदांमध्ये दुरुस्ती करून प्रसिद्धीकरण करण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला दिली. त्यानुसार यापूर्वी प्रसिद्धीकरण करण्यात आलेल्या ई-निविदांमधून अट काढून टाकण्यात आली आहे. आजपासूनच त्यावर अंमलबजावणी करण्यात आली, असे ई-निविदा कक्षाकडून सांगण्यात आले. कोणत्याही विकास कामासाठी स्पर्धा होण्यासाठी ई-निविदा पद्धत सुरू करण्यात आली. मात्र, ई-निविदा सादर केलेल्या ठेकेदारांना दोन दिवस अगोदर अनामत रक्कम भरल्याची पावती सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यामुळे निविदा उघडण्यापूर्वीच ठेकेदारांनी निविदेमध्ये सादर केलेले दर दिसून येत. त्यामुळे खरी स्पर्धा होत नव्हती. आता पालिकेने ती अट काढून टाकल्यामुळे नव्याने प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)