शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातल्या बारा लाख शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई-पीक नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व पीक पाहणी अचूक नोंद करण्यासाठी शासनाने ‘माझा सातबारा, मीच नोंदविणार पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व पीक पाहणी अचूक नोंद करण्यासाठी शासनाने ‘माझा सातबारा, मीच नोंदविणार पीक पेरा’ मोहीम हाती घेऊन शासनाने पंधरा ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी सुरू केली. आतापर्यंत राज्यात तब्बल १२ लाख ६ हजार २६९ शेतकऱ्यांनी मोबाईल फोनद्वारे ई-पीक नोंद केली. यामध्ये राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक हे प्रगत जिल्हेच मागे असून धुळे व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदी करून राज्यात आघाडी घेतली आहे.

महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र, दोन-तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा नेहमी आक्षेप होता. राज्यात सर्वाधिक खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी केली आहे. धुळे आणि अमरावती येथेही अनुक्रमे १ लाख ३ हजार आणि ८७ हजार १६७ शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली आहे.

ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने पिकांची ‘रिअल टाइम’ नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले असून, पंधरा ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी महसूल विभागातर्फे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २८ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कोल्हापूर (२८ हजार ३१५), नाशिक (७५ हजार), सांगली (१८ हजार ३९९), सातारा (१६ हजार १२९) या जिल्ह्यांमध्येही प्रतिसाद तुलनेने कमी आहे.

चौकट

राज्यात मोहिमेला वाढता प्रतिसाद

ई-पीक पाहणी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणीपूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. आता सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ई-पीक पाहणीचा शंभर टक्के वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

-रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प