शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

जिल्ह्यात ९३ गावांत ‘ई-बँकिंग’

By admin | Updated: March 26, 2015 23:01 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत.

पुणे : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत. १२0८ खातेदार जोडले गेले आहेत. जनधन योजनेंतर्गत ५ हजार ७८0 जणांची खाती उघडली आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पाद्वारे सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडून, सर्व कारभार संगणकीय आणि ‘आॅनलाइन’ करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे सुरूकेले. देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ‘आॅप्टिकल फायबर केबल’ नेटवर्कने जोडण्यासाठी भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाने सुरु केली. तिच्याद्वारे ग्रामपंचायत स्तरापर्यंत उच्च क्षमता आणि उच्च दर्जाची ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिवीटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनी यांच्यात त्रिस्तरीय करार १२ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आला होता. त्यामुळे ई-गव्हर्नन्स आणि ई-पंचायत प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. जिल्ह्यात ६४४ ग्रामपंचायतींमध्ये व्यवहार सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबर २0१३ पासून केवळ ९३ ग्रापंचायतींत ही सुविधा सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक १७ तर बारामतीत १६ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू आहेत. हवेलीत १५ तर खेडमध्ये १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वेल्हे तालुक्यात पक्त एका ग्रामपंचायतीत ही सुविधा सुरू आहे. मावळमध्ये अद्याप एकाही ग्रामपंचायतीत ही व्यवस्था नाही. बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींमध्ये संगणक समन्वयक शासनाने नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत ही खाती चालविली जातात. त्यातून ग्रामपंचायतीला ५० टक्के कमिशन मिळते; तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेलाही कमिशनचा काही हिस्सा मिळतो. (प्रतिनिधी)तालुका सेंटरखातेदारआंबेगाव ४ २१बारामती १६ ४२भोर२ ५२दौैंड२ १९हवेली१५ ३९इंदापूर ३ ३१जुन्नर १७ ४६खेड५७ १४मावळ0 १४मुळशी३ ९पुरंदर६ १४शिरूर१0 ३४वेल्हा१ १४एकूण९३ ४१९सध्या सर्व ठिकाणी ‘इंटरनेट कनेक्टिवीटी’ मिळत नसल्याने जिथे ती आहे, अशा ठिकाणी बँकिंग व्यवहार सुरूकरण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र भविष्यात ब्रॉडबँडने सर्व ग्रामपंचायती जोडल्यावर सर्वत्र बँकसेवा सुरूकरता येईल,- नितीन माने , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)