शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

जिल्ह्यात ९३ गावांत ‘ई-बँकिंग’

By admin | Updated: March 26, 2015 23:01 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत.

पुणे : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत. १२0८ खातेदार जोडले गेले आहेत. जनधन योजनेंतर्गत ५ हजार ७८0 जणांची खाती उघडली आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पाद्वारे सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडून, सर्व कारभार संगणकीय आणि ‘आॅनलाइन’ करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे सुरूकेले. देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ‘आॅप्टिकल फायबर केबल’ नेटवर्कने जोडण्यासाठी भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाने सुरु केली. तिच्याद्वारे ग्रामपंचायत स्तरापर्यंत उच्च क्षमता आणि उच्च दर्जाची ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिवीटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनी यांच्यात त्रिस्तरीय करार १२ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आला होता. त्यामुळे ई-गव्हर्नन्स आणि ई-पंचायत प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. जिल्ह्यात ६४४ ग्रामपंचायतींमध्ये व्यवहार सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबर २0१३ पासून केवळ ९३ ग्रापंचायतींत ही सुविधा सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक १७ तर बारामतीत १६ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू आहेत. हवेलीत १५ तर खेडमध्ये १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वेल्हे तालुक्यात पक्त एका ग्रामपंचायतीत ही सुविधा सुरू आहे. मावळमध्ये अद्याप एकाही ग्रामपंचायतीत ही व्यवस्था नाही. बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींमध्ये संगणक समन्वयक शासनाने नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत ही खाती चालविली जातात. त्यातून ग्रामपंचायतीला ५० टक्के कमिशन मिळते; तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेलाही कमिशनचा काही हिस्सा मिळतो. (प्रतिनिधी)तालुका सेंटरखातेदारआंबेगाव ४ २१बारामती १६ ४२भोर२ ५२दौैंड२ १९हवेली१५ ३९इंदापूर ३ ३१जुन्नर १७ ४६खेड५७ १४मावळ0 १४मुळशी३ ९पुरंदर६ १४शिरूर१0 ३४वेल्हा१ १४एकूण९३ ४१९सध्या सर्व ठिकाणी ‘इंटरनेट कनेक्टिवीटी’ मिळत नसल्याने जिथे ती आहे, अशा ठिकाणी बँकिंग व्यवहार सुरूकरण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र भविष्यात ब्रॉडबँडने सर्व ग्रामपंचायती जोडल्यावर सर्वत्र बँकसेवा सुरूकरता येईल,- नितीन माने , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)