शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वर्षभरात भोरमध्ये २६ जनावरांची बिबट्याने केली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

-- अयाज तांबोळी : डेहणे जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व ...

--

अयाज तांबोळी : डेहणे

जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व परिसरामध्ये (राजगुरुनगर वनविभाग हद्द) बिबट्याने तब्बल २६ पाळीव जनावरांची शिकार केली आहे. या प्रत्येक घटनेची नोंदव पंचनामा सरकारी पातळीवर झाली असली, तरी जनावरांच्या मालकांना ना वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळाली ना महसूल विभागाकडून त्याचा पाठपुरावा झाला.

भोरगिरी व वेलवळी गावात बिबट्याने नुकतीच दोन वासरांची शिकार केली, त्यापूर्वी या परिसरातूनच एक गाय व आठ शेळ्यांचाही बिबट्याने फाडशा पाडला आहे. त्यामुळे अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. प्रादेशिक वनविभागातील चासकमान धरण परिसरातही बिबट्याच्या बछड्याचा झालेला अपघात पाहता बिबट्यांची आणखी काही पिले या परिसरात वाढत असल्याचे स्पष्ट असून काही ग्रामस्थांना त्याचे दर्शनही झाले आहे.

अपघातात मृत्यू पडलेल्या बिबट्याचा बछडा सापडला असतानाही या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नसल्याचे वनविभाग सांगत असून त्यामुळे अद्याप बिबट्यांच्या उच्छदावर त्यांनी कोणत्याच प्रकारची उपाययोजना केली नाही, दुसरीकडे मात्र परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक खेड तालुक्याच्या विविध भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढल्याचे मागील काही दिवसातील आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलेला असताना, 'तो बिबट्या नव्हेच' अशी विसंगत भूमिका वनविभाग घेत असला तरी वनविभाग गावोगावी जनजागृती करताना मात्र दिसत आहे. पशुधना बरोबर नागरिकांवर होणारे हल्ले पहाता, वनविभाग गस्त, संरक्षण व आवश्यक दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे.

--

चौकट

बिबट्या लांडगे व तरसचा उच्छाद-

राजगुरुनगर वनखात्यांतर्गत जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ अखेरपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात २६ जनावरे मृत्युमुखी पडली.

लाडंग्याच्या हल्ल्यात २५ आणि तरसाच्या हल्ल्यात १ जनावर ठार झाले. सुमारे ४१ पशुपालकांच्या ५२ पशुधनापैकी ३४ शेळ्या,११ बोकड,२ मेंढ्या आणि गाई बैल प्रत्येकी एक जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे यांनी दिली. मात्र दुसरीकडे भीमाशंकर अभयारण्यातील वरिष्ठ अधिकारी अजुनही पशुपालकांना नुकसानभरपाई देेेेऊ शकलेे नाहीत. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहे.

--

चौकट

आत्तापर्यंत एक लाख ३३ हजारांची नुकसानभरपाई

हिंस्त्रश्वापदाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पशुधनापोटी नुकसानग्रस्त पशुपालकांना १ लाख ३३ हजार ७५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. तर तालुक्यात ३६ रानडुक्कर,२ कोल्हे आणि एक भेकरामुळे झालेल्या ३९ शेतक-यांचे पीक नुकसानभरपाई पोटी ८८ हजार ६७५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.