शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात भोरमध्ये २६ जनावरांची बिबट्याने केली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

-- अयाज तांबोळी : डेहणे जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व ...

--

अयाज तांबोळी : डेहणे

जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व परिसरामध्ये (राजगुरुनगर वनविभाग हद्द) बिबट्याने तब्बल २६ पाळीव जनावरांची शिकार केली आहे. या प्रत्येक घटनेची नोंदव पंचनामा सरकारी पातळीवर झाली असली, तरी जनावरांच्या मालकांना ना वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळाली ना महसूल विभागाकडून त्याचा पाठपुरावा झाला.

भोरगिरी व वेलवळी गावात बिबट्याने नुकतीच दोन वासरांची शिकार केली, त्यापूर्वी या परिसरातूनच एक गाय व आठ शेळ्यांचाही बिबट्याने फाडशा पाडला आहे. त्यामुळे अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. प्रादेशिक वनविभागातील चासकमान धरण परिसरातही बिबट्याच्या बछड्याचा झालेला अपघात पाहता बिबट्यांची आणखी काही पिले या परिसरात वाढत असल्याचे स्पष्ट असून काही ग्रामस्थांना त्याचे दर्शनही झाले आहे.

अपघातात मृत्यू पडलेल्या बिबट्याचा बछडा सापडला असतानाही या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नसल्याचे वनविभाग सांगत असून त्यामुळे अद्याप बिबट्यांच्या उच्छदावर त्यांनी कोणत्याच प्रकारची उपाययोजना केली नाही, दुसरीकडे मात्र परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक खेड तालुक्याच्या विविध भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढल्याचे मागील काही दिवसातील आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलेला असताना, 'तो बिबट्या नव्हेच' अशी विसंगत भूमिका वनविभाग घेत असला तरी वनविभाग गावोगावी जनजागृती करताना मात्र दिसत आहे. पशुधना बरोबर नागरिकांवर होणारे हल्ले पहाता, वनविभाग गस्त, संरक्षण व आवश्यक दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे.

--

चौकट

बिबट्या लांडगे व तरसचा उच्छाद-

राजगुरुनगर वनखात्यांतर्गत जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ अखेरपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात २६ जनावरे मृत्युमुखी पडली.

लाडंग्याच्या हल्ल्यात २५ आणि तरसाच्या हल्ल्यात १ जनावर ठार झाले. सुमारे ४१ पशुपालकांच्या ५२ पशुधनापैकी ३४ शेळ्या,११ बोकड,२ मेंढ्या आणि गाई बैल प्रत्येकी एक जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे यांनी दिली. मात्र दुसरीकडे भीमाशंकर अभयारण्यातील वरिष्ठ अधिकारी अजुनही पशुपालकांना नुकसानभरपाई देेेेऊ शकलेे नाहीत. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहे.

--

चौकट

आत्तापर्यंत एक लाख ३३ हजारांची नुकसानभरपाई

हिंस्त्रश्वापदाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पशुधनापोटी नुकसानग्रस्त पशुपालकांना १ लाख ३३ हजार ७५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. तर तालुक्यात ३६ रानडुक्कर,२ कोल्हे आणि एक भेकरामुळे झालेल्या ३९ शेतक-यांचे पीक नुकसानभरपाई पोटी ८८ हजार ६७५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.