शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात भोरमध्ये २६ जनावरांची बिबट्याने केली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

-- अयाज तांबोळी : डेहणे जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व ...

--

अयाज तांबोळी : डेहणे

जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व परिसरामध्ये (राजगुरुनगर वनविभाग हद्द) बिबट्याने तब्बल २६ पाळीव जनावरांची शिकार केली आहे. या प्रत्येक घटनेची नोंदव पंचनामा सरकारी पातळीवर झाली असली, तरी जनावरांच्या मालकांना ना वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळाली ना महसूल विभागाकडून त्याचा पाठपुरावा झाला.

भोरगिरी व वेलवळी गावात बिबट्याने नुकतीच दोन वासरांची शिकार केली, त्यापूर्वी या परिसरातूनच एक गाय व आठ शेळ्यांचाही बिबट्याने फाडशा पाडला आहे. त्यामुळे अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. प्रादेशिक वनविभागातील चासकमान धरण परिसरातही बिबट्याच्या बछड्याचा झालेला अपघात पाहता बिबट्यांची आणखी काही पिले या परिसरात वाढत असल्याचे स्पष्ट असून काही ग्रामस्थांना त्याचे दर्शनही झाले आहे.

अपघातात मृत्यू पडलेल्या बिबट्याचा बछडा सापडला असतानाही या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नसल्याचे वनविभाग सांगत असून त्यामुळे अद्याप बिबट्यांच्या उच्छदावर त्यांनी कोणत्याच प्रकारची उपाययोजना केली नाही, दुसरीकडे मात्र परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक खेड तालुक्याच्या विविध भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढल्याचे मागील काही दिवसातील आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलेला असताना, 'तो बिबट्या नव्हेच' अशी विसंगत भूमिका वनविभाग घेत असला तरी वनविभाग गावोगावी जनजागृती करताना मात्र दिसत आहे. पशुधना बरोबर नागरिकांवर होणारे हल्ले पहाता, वनविभाग गस्त, संरक्षण व आवश्यक दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे.

--

चौकट

बिबट्या लांडगे व तरसचा उच्छाद-

राजगुरुनगर वनखात्यांतर्गत जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ अखेरपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात २६ जनावरे मृत्युमुखी पडली.

लाडंग्याच्या हल्ल्यात २५ आणि तरसाच्या हल्ल्यात १ जनावर ठार झाले. सुमारे ४१ पशुपालकांच्या ५२ पशुधनापैकी ३४ शेळ्या,११ बोकड,२ मेंढ्या आणि गाई बैल प्रत्येकी एक जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे यांनी दिली. मात्र दुसरीकडे भीमाशंकर अभयारण्यातील वरिष्ठ अधिकारी अजुनही पशुपालकांना नुकसानभरपाई देेेेऊ शकलेे नाहीत. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहे.

--

चौकट

आत्तापर्यंत एक लाख ३३ हजारांची नुकसानभरपाई

हिंस्त्रश्वापदाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पशुधनापोटी नुकसानग्रस्त पशुपालकांना १ लाख ३३ हजार ७५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. तर तालुक्यात ३६ रानडुक्कर,२ कोल्हे आणि एक भेकरामुळे झालेल्या ३९ शेतक-यांचे पीक नुकसानभरपाई पोटी ८८ हजार ६७५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.