शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वर्षभरात भोरमध्ये २६ जनावरांची बिबट्याने केली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

-- अयाज तांबोळी : डेहणे जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व ...

--

अयाज तांबोळी : डेहणे

जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व परिसरामध्ये (राजगुरुनगर वनविभाग हद्द) बिबट्याने तब्बल २६ पाळीव जनावरांची शिकार केली आहे. या प्रत्येक घटनेची नोंदव पंचनामा सरकारी पातळीवर झाली असली, तरी जनावरांच्या मालकांना ना वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळाली ना महसूल विभागाकडून त्याचा पाठपुरावा झाला.

भोरगिरी व वेलवळी गावात बिबट्याने नुकतीच दोन वासरांची शिकार केली, त्यापूर्वी या परिसरातूनच एक गाय व आठ शेळ्यांचाही बिबट्याने फाडशा पाडला आहे. त्यामुळे अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. प्रादेशिक वनविभागातील चासकमान धरण परिसरातही बिबट्याच्या बछड्याचा झालेला अपघात पाहता बिबट्यांची आणखी काही पिले या परिसरात वाढत असल्याचे स्पष्ट असून काही ग्रामस्थांना त्याचे दर्शनही झाले आहे.

अपघातात मृत्यू पडलेल्या बिबट्याचा बछडा सापडला असतानाही या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नसल्याचे वनविभाग सांगत असून त्यामुळे अद्याप बिबट्यांच्या उच्छदावर त्यांनी कोणत्याच प्रकारची उपाययोजना केली नाही, दुसरीकडे मात्र परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक खेड तालुक्याच्या विविध भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढल्याचे मागील काही दिवसातील आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलेला असताना, 'तो बिबट्या नव्हेच' अशी विसंगत भूमिका वनविभाग घेत असला तरी वनविभाग गावोगावी जनजागृती करताना मात्र दिसत आहे. पशुधना बरोबर नागरिकांवर होणारे हल्ले पहाता, वनविभाग गस्त, संरक्षण व आवश्यक दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे.

--

चौकट

बिबट्या लांडगे व तरसचा उच्छाद-

राजगुरुनगर वनखात्यांतर्गत जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ अखेरपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात २६ जनावरे मृत्युमुखी पडली.

लाडंग्याच्या हल्ल्यात २५ आणि तरसाच्या हल्ल्यात १ जनावर ठार झाले. सुमारे ४१ पशुपालकांच्या ५२ पशुधनापैकी ३४ शेळ्या,११ बोकड,२ मेंढ्या आणि गाई बैल प्रत्येकी एक जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे यांनी दिली. मात्र दुसरीकडे भीमाशंकर अभयारण्यातील वरिष्ठ अधिकारी अजुनही पशुपालकांना नुकसानभरपाई देेेेऊ शकलेे नाहीत. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहे.

--

चौकट

आत्तापर्यंत एक लाख ३३ हजारांची नुकसानभरपाई

हिंस्त्रश्वापदाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पशुधनापोटी नुकसानग्रस्त पशुपालकांना १ लाख ३३ हजार ७५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. तर तालुक्यात ३६ रानडुक्कर,२ कोल्हे आणि एक भेकरामुळे झालेल्या ३९ शेतक-यांचे पीक नुकसानभरपाई पोटी ८८ हजार ६७५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.