शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात आम्ही काम करण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:10 IST

पुणे : कोरोना काळात राज्य आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. नेमके याच वर्षात राज्य सरकारच्या सेवेतील तब्बल अडीच लाख ...

पुणे : कोरोना काळात राज्य आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. नेमके याच वर्षात राज्य सरकारच्या सेवेतील तब्बल अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. कोरोना काळात शासनाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती न देता हे मनुष्यबळ पुढील दोन वर्षे वापरल्यास राज्य शासनाचा फायदा होईल. त्यामुळे राज्य शासनाने सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० पर्यंत वाढवावे, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह २२ राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. राज्य सरकारच्या अर्थ, कृषी आणि पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महसूल, गृह, सार्वजनिक आरोग्य, सामान्य प्रशासन अशा अनेक विभागांमधून या वर्षात अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. कोरोना साथीमध्ये पडलेला आर्थिक ताण पाहता ही पदे आगामी दोन तीन वर्षे भरली जातील याबाबत शंका आहे. त्यातच एमपीएससीच्याही परीक्षा होत नसल्याने नवीन अधिकारी येणार कुठून असा प्रश्न आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त झाल्यावर मनुष्यबळाची समस्या उभी राहणार आहे. यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काची पेन्शन, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युएटी फंड व इतर सेवामूल्य शासनास द्यावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीची सद्यःस्थिती पाहता शासनाला अडीच लाख लोकांची रक्कम देणे अवघड होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष केल्यास तूर्तास हा मोठा खर्च टळणार असून मनुष्यबळाची उणीवही भासणार नाही असे सरचिटणीस विश्वास काटकर म्हणाले.

अर्थ विभागाने देखील याविषयी आढावा घेत आर्थिक बचतीसाठी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याच्या पर्यायाचा उपयोग होईल असे मत नोंदविले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापुढे सादरीकरणही केले आहे. याबाबत सरकार अनुकूल असून ३० एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत यावर फेरविचार होणे अपेक्षित असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.