शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोना काळात आम्ही काम करण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:10 IST

पुणे : कोरोना काळात राज्य आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. नेमके याच वर्षात राज्य सरकारच्या सेवेतील तब्बल अडीच लाख ...

पुणे : कोरोना काळात राज्य आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. नेमके याच वर्षात राज्य सरकारच्या सेवेतील तब्बल अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. कोरोना काळात शासनाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती न देता हे मनुष्यबळ पुढील दोन वर्षे वापरल्यास राज्य शासनाचा फायदा होईल. त्यामुळे राज्य शासनाने सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० पर्यंत वाढवावे, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह २२ राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. राज्य सरकारच्या अर्थ, कृषी आणि पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महसूल, गृह, सार्वजनिक आरोग्य, सामान्य प्रशासन अशा अनेक विभागांमधून या वर्षात अडीच लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. कोरोना साथीमध्ये पडलेला आर्थिक ताण पाहता ही पदे आगामी दोन तीन वर्षे भरली जातील याबाबत शंका आहे. त्यातच एमपीएससीच्याही परीक्षा होत नसल्याने नवीन अधिकारी येणार कुठून असा प्रश्न आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त झाल्यावर मनुष्यबळाची समस्या उभी राहणार आहे. यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काची पेन्शन, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युएटी फंड व इतर सेवामूल्य शासनास द्यावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीची सद्यःस्थिती पाहता शासनाला अडीच लाख लोकांची रक्कम देणे अवघड होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष केल्यास तूर्तास हा मोठा खर्च टळणार असून मनुष्यबळाची उणीवही भासणार नाही असे सरचिटणीस विश्वास काटकर म्हणाले.

अर्थ विभागाने देखील याविषयी आढावा घेत आर्थिक बचतीसाठी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याच्या पर्यायाचा उपयोग होईल असे मत नोंदविले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापुढे सादरीकरणही केले आहे. याबाबत सरकार अनुकूल असून ३० एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत यावर फेरविचार होणे अपेक्षित असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.