शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

गावविकासात खोडा

By admin | Updated: May 25, 2015 05:51 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या हद्दीतील इमारतींवरील करआकारणी करण्यास शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्थगिती दिल्याने गावांच्या उत्पन्नावर गदा आली

पिंपरी : न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या हद्दीतील इमारतींवरील करआकारणी करण्यास शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्थगिती दिल्याने गावांच्या उत्पन्नावर गदा आली आहे. परिणामी गावांच्या विकासासाठी निधी उभा करण्यात मोठा अडसर झाल्याने गावगाडा कसा हाकायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे करवसुलीस असणाऱ्या या स्थगितीबाबत ग्रामस्थ, तसेच गावपुढाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ग्रामपंचायतींकडून हद्दीप्रमाणे असणाऱ्या मिळकतींवर करआकारणी केली जात आहे. त्यामध्ये बदल होण्यासाठी न्यायालयामध्ये क्र. ६५/२००१ नुसार याचिका दाखल झाली होती. मागणीच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आहे. तशा सूचना शासनाला केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून ग्रामविकास विभागाने नवीन करधोरण अस्तित्वात येईपर्यंत ग्रामपंचायतींनी मिळकतींवर कर वसूल करू नये असे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नवीन प्रणाली अस्तीत्वात येईपर्यंत आणि पुढील आदेश मिळेपर्यंत प्रशासनाने १ एप्रिलपासून करवसुली करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे परिपत्रक मिळाल्यापासून ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारच्या मिळकतींवरील कर घेता येणार नाहीत. मिळकतनोंंदी, फेरफारनोंदी करता येणार नाहीत. घरठाण उतारे, वीजजोड घेण्यासाठी, तसेच व्यवसाय उभारणीसाठी लागणारे ना हरकत दाखलेही देता येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. त्यातच प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर अद्यापही निर्णय होत नसल्याने ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा मार्गच खुंटला आहे. ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळण्याचा कर हाच मुख्य स्रोत आहे. या उत्पन्नाच्या आधारेच ग्रामपंचायत निधी उभा करून गावातील अंतर्गत रस्तेनिर्मिती, गटारांची सुविधा, कचरा निर्मुलन, आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. या वर्षीच्या मार्चअखेरपर्यंत अनेक ग्रामपंचायतींनी आपल्याकडील बहुतांश निधी प्रस्तावित विकासकामांसाठी खर्च केला आहे. त्यामुळे मार्चनंतर तिजोरीत नव्याने भरणा होईल, असा प्रयत्न गावचे पदाधिकारी करीत होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी कराचे प्रमाण वाढवून नव्याने आपले अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी केली होती. मात्र हातात निधीच नसल्याने ग्रामविकासासाठी आर्थिक तरतूद कशी करावी असा प्रश्न कारभाऱ्यांपुढे पडला आहे. पदाधिकाऱ्यांच्या मासिक सभेत कोणते विषय मंजूर करायचे असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे आहे. हातात घेतलेली कामेही निधीअभावी रखडू लागली आहेत.याबाबत ग्रामस्थांमधून, तसेच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. करवसुलीस असणारी स्थगिती उठवावी, त्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रशासनाने तत्काळ कराव्यात, अशी मागणी ते करीत आहेत.(प्रतिनिधी)