शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जलयुक्त शिवारच्या कामांमुळे या वर्षी टँकर झाले कमी

By admin | Updated: May 11, 2017 04:20 IST

दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन उन्हाळ्यात टँकरची संख्या घटली आहे. गेल्या उन्हाळ्यात तालुक्यात २८ टँकर सुरू होते. त्यातुलनेत उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात ३ टँकर सुरू असून ४ गावांसाठी ४ टँकरचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी साधारणत: ७ टँकर वाढतील, अशी स्थिती आहे. परिणामी, १८ टँकरची संख्या घटलेली आहे. पडवी, खोर, कुसेगाव या परिसरात सातत्याने टँकर सुरू असायचे; मात्र सध्याच्या परिस्थितीत या गावांना टँकरने पाणीपुरवठा नाही. खडकवासला कॅनॉलवरून ३३ गावांना पाणीपुरवठा होतो, तर भीमा नदीकाठावरच्या ९ गावांना पाणीपुरवठा नदीपात्रातून होतो. त्यामुळे नदीपात्र आणि खडकवासला कॅनॉलला पाणी असल्यामुळे पाणीटंचाई भासत नाही. जिरायत पट्ट्यात काही भागात जलयुक्त शिवाराची कामे होऊनदेखील टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत काही तलाव, ओढे, कोरडे ठणठणीत आहेत. कौठडी, ताम्हाणवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वासुंदे, हिंगणीगाडा, स्वामी चिंचोली या ठिकाणी टँकरची मागणी वाढली आहे. तर, अन्य काही गावांसह वाड्यावस्त्यांवर टँकरची गरज भासेल, असे एकंदरीत चित्र आहे.तेव्हा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नालाखोदाई, तलाव साफसफाई, चाऱ्या खोदणे इत्यादी कामे झाली असली, तरी ही योजना निसर्गावर अवलंबून असल्याने पाऊस पडला, तरच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी आडवा मोहीम यशस्वी होऊ शकते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चांगली कामे झाली, हे नाकारून चालणार नाही. परिणामी, या योजनेअंतर्गत वाढलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग काही जिरायत भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी झालेला आहे. २०१५-१६ वर्षांत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला, बंधारा खोदाई, नाला साफसफाई, गाळ काढणे इत्यादी कामे झाली आहेत. ही कामे विशेषत: रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, कुसेगाव, कौठडी, खडकी, नंदादेवी, पांढरेवाडी, स्वामी चिंचोली, जिरेगाव, देऊळगावगाडा, वाखारी, खोर, पडवी, यवत, डाळिंब, ताम्हाणवाडी, दापोडी या गावात झालेली आहेत. पावसाचे पाणी बऱ्यापैकी साठवले गेले होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमिनीत मुरल्याने काही जिरायती गावांत पाण्याची टंचाई आहे. येणारा पावसाळा जोरदार झाल्यास जमिनीत पाणी मुरण्याचा प्रकार राहणार नाही. परिणामी ओढे, नाले, तलाव यांत पाण्याचा साठा बऱ्यापैकी राहील. त्यानुसार पाणीटंचाईवर मात करता येईल.