शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

थकीत पाणीपट्टीमुळे १४ गावांचे पाणी बंद

By admin | Updated: February 11, 2016 03:05 IST

येथील उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समितीच्या साठवण तलावातून १४ गावांतील वाड्यावस्त्यांना केला जाणारा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे बंद

कुरवली : उद्धट (ता. इंदापूर) येथील उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समितीच्या साठवण तलावातून १४ गावांतील वाड्यावस्त्यांना केला जाणारा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे बंद आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून ही गावे पाण्याअभावी तहानलेली आहेत.या ठिकाणाहून कुरवली, तावशी, उदमाईवाडी, घोलपवाडी, उद्घट, जांब, चिखली, पवारवाडी, थोरातवाडी, मानकरवाडी या गावांसह वाड्यावस्तींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या भागातील ग्रामपंचायतकडे लाखो रुपये थकीत पाणीपट्टी आहे. त्यामुळे सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे.संबंधित गावातील ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांनी सांगितले की, थकीत बिलापैकी काही रक्कम जमा केली आहे. थकीत बिले लवकर भरण्याची हमी देऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याबाबत समितीने नकार दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने यांनी पाणीपुरवठा समिती हिशोबाच्या गोंधळाबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागविली आहे.देखभाल समितीविरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माने यांनी सांगितले की, या पाणीपुरवठा योजनेत अनेक त्रुटी आहे. आर्थिक बाबतीत सावळा गोंधळ आहे. मुख्य लाईनवर ठिकठिकाणी मनमानी पद्धतीने नळजोड दिले आहेत. त्यांच्या पाणीपट्टी वसुलीबाबतीत तसेच ग्रामपंचायत यांना पाणीबिले आकारण्यात आली आहेत. त्यामध्ये देखील गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. वसुलीबाबतीतही मोठा गैरव्यवहार झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.(वार्ताहर)