शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

गाव कारभाऱ्यांमुळे तोंडचे पाणी पळाले

By admin | Updated: January 11, 2016 01:35 IST

करंदी खे.बा. (ता. भोर) येथे पाणीपुरवठा योजनेसाठीे ४९ लाख खर्च करून गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात गावाला यश आले

कापूरव्होळ : करंदी खे.बा. (ता. भोर) येथे पाणीपुरवठा योजनेसाठीे ४९ लाख खर्च करून गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात गावाला यश आले. पण, करंदी खेबाच्या पाणीपुरवठा खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा झालेला नाही. त्यामुळे व पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा पगार न झाल्यामुळे गावचा सार्वजनिक पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे महिलांनी डोक्यावरून पाण्याचा हंडा आणताना नवीन वर्षाची गावाला ग्रामपंचायतीने भेट दिली असल्याची चर्चा विहिरीपासून ते गावच्या पारापर्यंत व घराघरांत रंगली. गावातील काही नागरिकांनी गावची पाणीपट्टी थकवल्यामुळे नळाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ज्या नागरिकांनी नियमितपणे गावच्या पाणीपट्ट्या भरल्या आहेत, अशा नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पट्टी भरणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. गावातील काही धनदांडगे यांनी पिण्याच्या पाण्याचा वापर घराभोवताली बागायत करण्यासाठी करत असल्यामुळे गावचा नळ पाणी पुरवठा सध्या अडचणीचा झालेला आहे. शासनाने गावात पाणीपटटी वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीला अनेक अधिकार देण्यात आलेले असताना अशा पध्दतीने पाणी पुरवठा अचानक बंद ठेवून नागरीकांना वेठीस धरले आह. या बाबत ग्रामपंचायत व ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठा कर्मचारी यांची ही भूमिका नागरीकांना अडचण व अडवणूक निर्माण करणारी आहे. या बाबत गावातील महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीने गावात पाणी पटटी वसूल करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचेही बोलले जात आहे.