शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे हिरड्याचा बहर गेला झडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

तळेघर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खो-यामध्ये पडलेल्या मुसळधार गारांच्या अवकाळी पावसामुळे ...

तळेघर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खो-यामध्ये पडलेल्या मुसळधार गारांच्या अवकाळी पावसामुळे हिरडा व जनावरांसाठी लागणा-या चा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे हिरड्याचा बहर पूर्णपणे झडून गेला आहे.

पश्चिम आदिवासी भागामध्ये सलग दोन दिवस मुसळधार पडलेल्या अवकाळी पावसामुळे रचून ठेवलेले गवत भाताचा पेंढा भिजून गेला आहे. हा चारा भिजून गेल्यानंतर काळा पडतो व जनावरांच्या खाण्यालायक राहत नाही. यामुळे चा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर भात शेतीसाठी करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. नुकतीच भात शेतीच्या कामांसाठी सुरुवात झाली आहे. पावसामुळे पाडलेल्या रोमठे (जमिनीचे सपाटीकरण) उखडले असल्यामुळे आदिवासी बांधवांचे पुन्हा शेतीचे काम वाढले आहे. तर रोपे भाजणीसाठी जमा करण्यात आलेला शेणाचा गोवर, पालापाचोळा, भिजल्यामुळे भात रोपाच्या भाजणीचे काम पुढे ढकलावे लागणार आहे.

आदिवासी बांधवांच्या एकमेव उदरनिर्वाहाचे साधन समजल्या जाणा-या हिरड्यांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. सध्या हिरड्यांना नवी पालवी फुटून हिरड्या बहरत आहेत. पाऊसाचा व गारांचा मारा या बहरावरती झाल्याने हा बहर झडला आहे. त्यामुळे उत्पादन घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकसान झालेल्या हिरड्यांच्या झाडांचे प्रशासनाने पंचनामे करावेत, अशी मागणी माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे कोंढवळचे सरपंच दीपक चिमटे, रामदास लोहकरे भीमाशंकर देवस्थान विश्वस्त दत्तात्रय लोहकरे, बबन लोहकरे, दुंदा जढर व परिसरातील आदिवासी शेतक-यांनी केली आहे.

सध्या आमच्या भागामध्ये शेतीच्या मशागतीची काम सुरू आहेत. भात रोपे तयार करण्यासाठी अगोदर भात खाचरे भाजावी लागतात यासाठी भात खाचरे सपाट करावी लागतात याला आदिवासी रोमठा म्हणतात. आम्ही रोमठा पाडला असुन पडलेल्या पावसामुळे हा रोमठा उस्तरला असुन आमच्या आदिवासी बांधवांचे पुन्हा काम वाढले आहे. आता दहा-बारा दिवसानंतर जमीन तापल्यावर पुन्हा रोमठा पाडावा लागेल. त्याचप्रमाणे शेणाचा गोवर पालापाचोळा भिजल्यामुळे आता भात खाचरांची भाजणी पुढे ढकलावी लागणार आहे.

बबन लोहकरे

आदिवासी शेतकरी

१५ तळेघर

भीमाशंकर, पाटण व आहुपे खो-यामध्ये अवकाळी गारांच्या मुसळधार पावसाने हिरड्याचा बहर झडून गेला.