शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे कांद्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:10 IST

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डात मागील काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक काही ...

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डात मागील काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक काही प्रमाणात वाढू लागली होती. मात्र, तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी (दि. ९) ही आवक कमी होऊन फक्त अडीचशे क्विंटल कांद्याची आवक बाजारात झाली. परंतु आवक कमी झाल्याने बाजारभावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

चाकण मार्केट यार्डात नवीन कांद्याचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही दिवसांपासून सुरुवात झाली होती. परंतु, तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे फक्त पाच हजार पिशव्यांची म्हणजे २ हजार ५०० क्विंटलचीच आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत शनिवारी जवळपास साडे तीन हजार क्विंटल कांद्याची कमी आवक झाली. परंतु कांद्याला प्रति क्विंटलला ३५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. कांद्याची निर्यातबंदी हटल्याने बाजारभाव टिकून असल्याची माहिती सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

निर्यातबंदी हटल्याने परदेशात कांदा निर्यात होणार आहे. यामुळे देशातील महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव टिकून राहिले आहेत. जिल्ह्यातील चाकण व नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठ निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. चाकण येथील कांदा आखाती देश, श्रीलंका, दुबई, थायलंड,मलेशिया व सिंगापूर आदी देशात निर्यात होतो. चाकण बाजरातील कांदा निर्यातक्षम व टिकाऊ असल्याने याला मोठी मागणी असते. चाकण बाजारात निर्यातदार कंपन्या व व्यापारी काही टनांत कांदा खरेदी करून त्याची प्रतवारी व पॅकिंग करून परदेशात निर्यात करतात. कांदा टिकाऊ असल्याने अनेक मोठ्या कंपन्या व व्यापारी कांदा खरेदीसाठी चाकण बाजारात येत असतात. यामुळे कांद्याची मागणी वाढली जाते. त्यामुळे बाजारभाव टिकून राहिल्याने त्याचा फायदा शेतकरी व व्यापाऱ्यांना होतो आहे.

चौकट

नवीन कांद्याची आवक मागील काही दिवसांपासून सुरू झाली आहे. मात्र, तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना कांदा काढणी केली नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी येणारा कांदा निर्यातक्षम नसल्याने निर्यातदार कंपन्या व व्यापारी अजून खरेदीसाठी आले नाही. परंतु पुणे, मुंबई व दिल्ली या मोठ्या शहरांमधील व्यापारी हा कांदा खरेदी करत आहेत. निर्यातबंदी उठल्याने बाजारभाव टिकून राहील्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. - विनायक घुमटकर, सभापती, बाजार समिती.