शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

अवकाळीमुळे कांद्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:10 IST

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डात मागील काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक काही ...

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डात मागील काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक काही प्रमाणात वाढू लागली होती. मात्र, तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी (दि. ९) ही आवक कमी होऊन फक्त अडीचशे क्विंटल कांद्याची आवक बाजारात झाली. परंतु आवक कमी झाल्याने बाजारभावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

चाकण मार्केट यार्डात नवीन कांद्याचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही दिवसांपासून सुरुवात झाली होती. परंतु, तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे फक्त पाच हजार पिशव्यांची म्हणजे २ हजार ५०० क्विंटलचीच आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत शनिवारी जवळपास साडे तीन हजार क्विंटल कांद्याची कमी आवक झाली. परंतु कांद्याला प्रति क्विंटलला ३५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. कांद्याची निर्यातबंदी हटल्याने बाजारभाव टिकून असल्याची माहिती सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

निर्यातबंदी हटल्याने परदेशात कांदा निर्यात होणार आहे. यामुळे देशातील महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव टिकून राहिले आहेत. जिल्ह्यातील चाकण व नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठ निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. चाकण येथील कांदा आखाती देश, श्रीलंका, दुबई, थायलंड,मलेशिया व सिंगापूर आदी देशात निर्यात होतो. चाकण बाजरातील कांदा निर्यातक्षम व टिकाऊ असल्याने याला मोठी मागणी असते. चाकण बाजारात निर्यातदार कंपन्या व व्यापारी काही टनांत कांदा खरेदी करून त्याची प्रतवारी व पॅकिंग करून परदेशात निर्यात करतात. कांदा टिकाऊ असल्याने अनेक मोठ्या कंपन्या व व्यापारी कांदा खरेदीसाठी चाकण बाजारात येत असतात. यामुळे कांद्याची मागणी वाढली जाते. त्यामुळे बाजारभाव टिकून राहिल्याने त्याचा फायदा शेतकरी व व्यापाऱ्यांना होतो आहे.

चौकट

नवीन कांद्याची आवक मागील काही दिवसांपासून सुरू झाली आहे. मात्र, तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना कांदा काढणी केली नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी येणारा कांदा निर्यातक्षम नसल्याने निर्यातदार कंपन्या व व्यापारी अजून खरेदीसाठी आले नाही. परंतु पुणे, मुंबई व दिल्ली या मोठ्या शहरांमधील व्यापारी हा कांदा खरेदी करत आहेत. निर्यातबंदी उठल्याने बाजारभाव टिकून राहील्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. - विनायक घुमटकर, सभापती, बाजार समिती.