शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

नियोजनशून्य कारभारामुळे खोरची पेयजल योजना पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

रामदास डोंबे खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून ...

रामदास डोंबे

खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून बंद पडली गेली आहे. दुष्काळी भागाला उन्हाळ्याच्या कालावधीत देखील वरदान ठरेल या हेतूने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ही २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपये खर्चून ही पेयजल योजना राबविण्यात आली आहे. मात्र आज गेली १५ दिवसांपासून ही योजना केवळ खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे बंद पडली.

याबाबत माहिती देताना खोर ग्रामपंचायतचे उपसरपंच पोपट चौधरी म्हणाले की, ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांची पाणी योजना बंद झाली आहे. ग्रामपंचायतवर कर्मचारी कमी करण्याची वेळ आज आली आहे.

लोकांचे पाण्यासाठी हाल सध्या हाल होत आहेत. कार्यालयाच्या दारात रोज येऊन बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामपंचायतकडून अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च होत असून खोर ग्रामपंचायत आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करीत असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. लोकांचे पाण्याचे हाल होत असल्याने शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून खोर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. खोर ग्रामपंचायतचे वीजबिल हे गेले अनेक वर्षांपासून थकीत असून, आज विद्युतीकरण तोडण्यास सुरुवात झाली आहे. एवढे मोठे दुहेरी अडचण आज ग्रामपंचायतने करून ठेवली असल्याचे उपसरपंच चौधरी यांंनी सांगितले आहे.

माजी सरपंच ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की, एका मोठ्या संघर्षातून खोरसारख्या दुष्काळी गावाला ही पाणी योजना मिळाली. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. दुष्काळी गावाला वरदान असलेली ही जलसंजीवनी योजना बंद पडणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून योजना पूर्ववत चालू ठेवावी.

ग्रामविकास अधिकारी एम. जी. पाडुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखाचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे.

याबाबतीत खोर ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली अडसूळ व त्यांचे पती संदीप अडसूळ या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी फोन न उचलता या पाण्याच्याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखांचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे

खोर (ता. दौंड) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गेली १५ दिवसांपासून बंद असून दुसऱ्या छायाचित्रात खोरच्या परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे शशांक फाउंडेशनने मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.