शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

नियोजनशून्य कारभारामुळे खोरची पेयजल योजना पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

रामदास डोंबे खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून ...

रामदास डोंबे

खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून बंद पडली गेली आहे. दुष्काळी भागाला उन्हाळ्याच्या कालावधीत देखील वरदान ठरेल या हेतूने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ही २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपये खर्चून ही पेयजल योजना राबविण्यात आली आहे. मात्र आज गेली १५ दिवसांपासून ही योजना केवळ खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे बंद पडली.

याबाबत माहिती देताना खोर ग्रामपंचायतचे उपसरपंच पोपट चौधरी म्हणाले की, ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांची पाणी योजना बंद झाली आहे. ग्रामपंचायतवर कर्मचारी कमी करण्याची वेळ आज आली आहे.

लोकांचे पाण्यासाठी हाल सध्या हाल होत आहेत. कार्यालयाच्या दारात रोज येऊन बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामपंचायतकडून अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च होत असून खोर ग्रामपंचायत आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करीत असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. लोकांचे पाण्याचे हाल होत असल्याने शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून खोर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. खोर ग्रामपंचायतचे वीजबिल हे गेले अनेक वर्षांपासून थकीत असून, आज विद्युतीकरण तोडण्यास सुरुवात झाली आहे. एवढे मोठे दुहेरी अडचण आज ग्रामपंचायतने करून ठेवली असल्याचे उपसरपंच चौधरी यांंनी सांगितले आहे.

माजी सरपंच ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की, एका मोठ्या संघर्षातून खोरसारख्या दुष्काळी गावाला ही पाणी योजना मिळाली. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. दुष्काळी गावाला वरदान असलेली ही जलसंजीवनी योजना बंद पडणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून योजना पूर्ववत चालू ठेवावी.

ग्रामविकास अधिकारी एम. जी. पाडुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखाचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे.

याबाबतीत खोर ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली अडसूळ व त्यांचे पती संदीप अडसूळ या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी फोन न उचलता या पाण्याच्याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखांचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे

खोर (ता. दौंड) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गेली १५ दिवसांपासून बंद असून दुसऱ्या छायाचित्रात खोरच्या परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे शशांक फाउंडेशनने मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.