शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्य कारभारामुळे खोरची पेयजल योजना पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

रामदास डोंबे खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून ...

रामदास डोंबे

खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून बंद पडली गेली आहे. दुष्काळी भागाला उन्हाळ्याच्या कालावधीत देखील वरदान ठरेल या हेतूने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ही २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपये खर्चून ही पेयजल योजना राबविण्यात आली आहे. मात्र आज गेली १५ दिवसांपासून ही योजना केवळ खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे बंद पडली.

याबाबत माहिती देताना खोर ग्रामपंचायतचे उपसरपंच पोपट चौधरी म्हणाले की, ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांची पाणी योजना बंद झाली आहे. ग्रामपंचायतवर कर्मचारी कमी करण्याची वेळ आज आली आहे.

लोकांचे पाण्यासाठी हाल सध्या हाल होत आहेत. कार्यालयाच्या दारात रोज येऊन बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामपंचायतकडून अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च होत असून खोर ग्रामपंचायत आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करीत असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. लोकांचे पाण्याचे हाल होत असल्याने शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून खोर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. खोर ग्रामपंचायतचे वीजबिल हे गेले अनेक वर्षांपासून थकीत असून, आज विद्युतीकरण तोडण्यास सुरुवात झाली आहे. एवढे मोठे दुहेरी अडचण आज ग्रामपंचायतने करून ठेवली असल्याचे उपसरपंच चौधरी यांंनी सांगितले आहे.

माजी सरपंच ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की, एका मोठ्या संघर्षातून खोरसारख्या दुष्काळी गावाला ही पाणी योजना मिळाली. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. दुष्काळी गावाला वरदान असलेली ही जलसंजीवनी योजना बंद पडणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून योजना पूर्ववत चालू ठेवावी.

ग्रामविकास अधिकारी एम. जी. पाडुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखाचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे.

याबाबतीत खोर ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली अडसूळ व त्यांचे पती संदीप अडसूळ या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी फोन न उचलता या पाण्याच्याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखांचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे

खोर (ता. दौंड) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गेली १५ दिवसांपासून बंद असून दुसऱ्या छायाचित्रात खोरच्या परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे शशांक फाउंडेशनने मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.