शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नियोजनशून्य कारभारामुळे खोरची पेयजल योजना पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

रामदास डोंबे खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून ...

रामदास डोंबे

खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून बंद पडली गेली आहे. दुष्काळी भागाला उन्हाळ्याच्या कालावधीत देखील वरदान ठरेल या हेतूने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ही २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपये खर्चून ही पेयजल योजना राबविण्यात आली आहे. मात्र आज गेली १५ दिवसांपासून ही योजना केवळ खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे बंद पडली.

याबाबत माहिती देताना खोर ग्रामपंचायतचे उपसरपंच पोपट चौधरी म्हणाले की, ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांची पाणी योजना बंद झाली आहे. ग्रामपंचायतवर कर्मचारी कमी करण्याची वेळ आज आली आहे.

लोकांचे पाण्यासाठी हाल सध्या हाल होत आहेत. कार्यालयाच्या दारात रोज येऊन बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामपंचायतकडून अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च होत असून खोर ग्रामपंचायत आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करीत असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. लोकांचे पाण्याचे हाल होत असल्याने शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून खोर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. खोर ग्रामपंचायतचे वीजबिल हे गेले अनेक वर्षांपासून थकीत असून, आज विद्युतीकरण तोडण्यास सुरुवात झाली आहे. एवढे मोठे दुहेरी अडचण आज ग्रामपंचायतने करून ठेवली असल्याचे उपसरपंच चौधरी यांंनी सांगितले आहे.

माजी सरपंच ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की, एका मोठ्या संघर्षातून खोरसारख्या दुष्काळी गावाला ही पाणी योजना मिळाली. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. दुष्काळी गावाला वरदान असलेली ही जलसंजीवनी योजना बंद पडणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून योजना पूर्ववत चालू ठेवावी.

ग्रामविकास अधिकारी एम. जी. पाडुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखाचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे.

याबाबतीत खोर ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली अडसूळ व त्यांचे पती संदीप अडसूळ या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी फोन न उचलता या पाण्याच्याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखांचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे

खोर (ता. दौंड) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गेली १५ दिवसांपासून बंद असून दुसऱ्या छायाचित्रात खोरच्या परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे शशांक फाउंडेशनने मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.