शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने पानवेली जळण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 5, 2014 06:34 IST

इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या ओढीमुळे नुकतेच बसवलेल्या पानवेली जळण्याच्या मार्गावर आहेत

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या ओढीमुळे नुकतेच बसवलेल्या पानवेली जळण्याच्या मार्गावर आहेत. तर उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी घालून जोपासलेल्या डाळींब बागा पाण्याच्या कमतरतेमुळे रोगाला बळी पडण्यास सुरूवात झाली आहे.जानेवारी, फेब्रवारी महिन्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली. त्यावेळी अनेका शेतकऱ्यांनी पानमळे व डाळींब बागा जगवण्यासाठी आपल्या शेतामध्ये लाखो रूपये खर्च करून तयार केलेली शेततळी सापडेल तेथून पाणी मिळवून भरून घेतली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना आजपर्यत आधार मिळाला. शेतकऱ्यांनी साठवलेले पाणी मार्च महिन्यापासून जूनआखेर वापरले. शेतकऱ्यांची भावना होती की जून महिन्यामध्ये पावसाळा निश्चीत सुरू होतो. एकदा पावसाळा सुरू झाल्यानंतर पिके जोपासण्यासाठी जास्त त्रास होत नाही. परंतू जून म्हिना संपून जुलै सुरू झाला, तरीही इंदापूर तालुक्यामध्ये अद्याप पावसाने तोंड दाखवले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरामध्ये नेहमीच पाण्याची कमतरता असते. मात्र, या भागातील शेतकरी उत्पन्न मिळवण्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे. परंतू पाण्यामूळे शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. या वर्षीही याचपध्दतीने शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा विपरित असा परिणाम आर्थिक प्रगतीवर झालेला दिसून येतो.पानवेलींना बाजारपेठ निमगाव केतकी येथेच असल्याने येथील शेतकरी पानवेली जोपासण्याचा प्रयत्न करतात. या पिकाकडे बारमाही उत्पन्न देणारे पीक म्हणून पाहिले जाते. या पानमळ्यांच्या मशागतीसाठी खर्च होत असला तरी यापासून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे या पिकाकडे येथील शेतकऱ्यांचा कल पहायला मिळतो. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने या पिकाला मोठा फटका बसत आहे. सद्य:स्थितीमध्ये पाण्याच्या टंचाईमूळे पानमळे जळण्याची भीती निर्माण झाली आहे. पानमळे हे दरवर्षी जानेवरी फेब्रवारीमध्ये बसवले जातात. यामध्ये लांबलेले वेल खाली घेऊन जमिनीमध्ये बसवले जातात. त्यांना खत पााणी घालून मशागत केली जाते. यानंतर दोन महिन्यामध्ये पुन्हा पानवेली उत्पन्न द्यायला सुरूवात होते. परंतू पावसाने ओढ दिल्याने या उत्पन्नाम्ध्ये मोठी घट झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पानाच्या उत्पन्नामध्ये फरक पडला आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे पावसाची ओढ लागल्याने शेतकरी पाऊस पडण्यासाठी परमेश्वराकडे विनवणी करत आहेत.इंदापुर तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाचे क्षेत्र कमी झाल. या ठिकाणी डाळींबाच्या बागा तयार झाल्या. गेल्या दोन वर्षामध्ये डाळींब बागांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक हतभार लावला. त्यामुळे अनेका शेतकरी या पिकाकडे आकर्षित झाले. बागांचे क्षेत्र वाढले. पण यंदा पाऊस नाही. (वार्ताहर)