शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

थर्माेकोलच्या ताट-वाट्यांमुळे धोका

By admin | Updated: April 24, 2017 04:28 IST

कोणताही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम असो, सामूहिक जेवणाच्या पंगतीत विशिष्ट झाडांच्या पानाची पत्रावळी आणि पानाचा

पेठ : कोणताही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम असो, सामूहिक जेवणाच्या पंगतीत विशिष्ट झाडांच्या पानाची पत्रावळी आणि पानाचा द्रोण याला विशेष महत्त्व असायचे. पानाची पत्रावळ ही वरणभात आणि भाजीचा स्वाद द्विगुणीत ठरवीत आले आहेत. म्हणून पंगतीचे जेवण आपसात प्रेम वाढवणारे ठरत आले आहे. परंतु आता ही पंगतीची परंपरा हळूहळू कमी होऊ लागली असून, बुफे पद्धत वाढत चालली आहे. ग्रामीण भागात पंगत आहे परंतु पत्रावळी गायब होताना दिसत आहेत. त्यामुळे पत्रावळीतील भोजनाचा स्वाद आणि द्रोणामध्ये कढी पिण्याचा आनंद पंगतीतून हरवला असल्याचे दिसत आहे.जुन्या पत्रावळींची जागा आता आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक, थर्माेकोलच्या ताट आणि वाट्यांनी घेतली आहे. जेवणासाठी प्लॅस्टिकच्या, थर्मोकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. जेवून वापरून झालेल्या पत्रावळ्या निष्काळजीपणे इतरत्र टाकल्या जातात. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून या पत्रावळ्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम कार्यमालकांनी करणे गरजेचे आहे.पूर्वीच्या काळी साल वृक्षाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी वापरण्याची प्रथा होती. परंतु काळाच्या ओघात आधुनिक पद्धतीच्या प्लॅस्टिकच्या, थर्माेकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या बऱ्याच वेळा फाटक्या असतात. सध्या जेवणात निरनिराळे अनेक पदार्थ करण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे पारंपरिक पत्रावळीत एवढे सगळे पदार्थ बसत नसल्याने प्लॅस्टिकच्या, थर्माेकोलच्या पत्रावळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. या पत्रावळ्यांची झीज लवकर होत नाही, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. या पत्रावळ्यांतील राहिलेले अन्न भटकी कुत्री, इतर जनावरे खातात. हे अन्न खाता खाता अन्नाबरोबरच पत्रावळीचा काही भाग त्यांच्या पोटात जाऊन त्यांनाही त्रास होण्याचा संभव लक्षात येत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून या पत्रावळ्या मातीत गाडून टाकणे, हा उपाय असून यापासून कोणताही धोका नसल्याचे लक्षात येत आहे. (वार्ताहर)