शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

शिवाजी महाराजांमुळे भारत राहिला हिंदूबहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:15 IST

विष्णू कोकजे : गजानन मेहेंदळे यांच्या ''छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...'' या पुस्तकाचे प्रकाशन पुणे : ‘‘शिवाजी महाराजांनी ...

विष्णू कोकजे : गजानन मेहेंदळे यांच्या ''छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...'' या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ‘‘शिवाजी महाराजांनी परिवर्तन घडवले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत हिंदूबहूल राहिला आहे. अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लीम झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले.

ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...’ या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत व लेखक मेहेंदळे उपस्थित होते.

कोकजे म्हणाले, ‘‘महाराजांचा आणि मराठ्यांचा सत्य इतिहास समाजासमोर आला पाहिजे. अनेक जण सध्या चुकीचा इतिहास समोर आणत आहेत, त्यासाठी सत्य समोर आणले गेले पाहिजे. महाराजांच्या गनिमी काव्याचे आज परदेशातही शिक्षण दिले जाते. इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांचे देखील छत्रपती शिवाजी महाराज हेच प्रेरणास्थान होते.’’

मेहेंदळे म्हणाले, ‘‘इतिहासाबद्दल खोटे, दिशाभूल करणारे लेखन खोडून काढले पाहिजे. त्यासाठी पुराव्यानिशी सत्य समोर आणलेच पाहिजे. सध्याच्या पाठ्यपुस्तकात देखील असत्य लेखन प्रसिद्ध केले जात आहे. त्याचे देखील खंडन केले पाहिजे. मोगलांनी हिंदू अस्मिता संपवण्यासाठी अनन्वित अत्याचार केले आहेत, त्याचे असंख्य पुरावे, आधार आहेत. ते समोर आणले तर खरा इतिहास समोर येईल.’’

प्रदीप रावत यांनीदेखील इतिहासाच्या विकृतीकरणाचा समाचार घेतला. केवळ व्यक्ती संपून चालणार नाही तर जुलूम करणारी विकृत प्रवृत्ती, वाईट विचारसरणी संपवली पाहिजे. शांततापूर्ण सहजीवन इस्लाममुळे शक्य झालेले नाही, अशा अहिष्णू प्रवृतीशी लढा द्यावाच लागेल, असे त्यांनी सांगितले. सुधीर थोरात यांनी प्रास्ताविक केले. नीलेश धायारकर यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन विवेक विचार मंच आणि श्री शिवशंभू विचार दर्शन या संस्थांनी केले होते.

------