शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

शिवाजी महाराजांमुळे भारत राहिला हिंदूबहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:15 IST

विष्णू कोकजे : गजानन मेहेंदळे यांच्या ''छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...'' या पुस्तकाचे प्रकाशन पुणे : ‘‘शिवाजी महाराजांनी ...

विष्णू कोकजे : गजानन मेहेंदळे यांच्या ''छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...'' या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ‘‘शिवाजी महाराजांनी परिवर्तन घडवले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत हिंदूबहूल राहिला आहे. अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लीम झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले.

ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...’ या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत व लेखक मेहेंदळे उपस्थित होते.

कोकजे म्हणाले, ‘‘महाराजांचा आणि मराठ्यांचा सत्य इतिहास समाजासमोर आला पाहिजे. अनेक जण सध्या चुकीचा इतिहास समोर आणत आहेत, त्यासाठी सत्य समोर आणले गेले पाहिजे. महाराजांच्या गनिमी काव्याचे आज परदेशातही शिक्षण दिले जाते. इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांचे देखील छत्रपती शिवाजी महाराज हेच प्रेरणास्थान होते.’’

मेहेंदळे म्हणाले, ‘‘इतिहासाबद्दल खोटे, दिशाभूल करणारे लेखन खोडून काढले पाहिजे. त्यासाठी पुराव्यानिशी सत्य समोर आणलेच पाहिजे. सध्याच्या पाठ्यपुस्तकात देखील असत्य लेखन प्रसिद्ध केले जात आहे. त्याचे देखील खंडन केले पाहिजे. मोगलांनी हिंदू अस्मिता संपवण्यासाठी अनन्वित अत्याचार केले आहेत, त्याचे असंख्य पुरावे, आधार आहेत. ते समोर आणले तर खरा इतिहास समोर येईल.’’

प्रदीप रावत यांनीदेखील इतिहासाच्या विकृतीकरणाचा समाचार घेतला. केवळ व्यक्ती संपून चालणार नाही तर जुलूम करणारी विकृत प्रवृत्ती, वाईट विचारसरणी संपवली पाहिजे. शांततापूर्ण सहजीवन इस्लाममुळे शक्य झालेले नाही, अशा अहिष्णू प्रवृतीशी लढा द्यावाच लागेल, असे त्यांनी सांगितले. सुधीर थोरात यांनी प्रास्ताविक केले. नीलेश धायारकर यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन विवेक विचार मंच आणि श्री शिवशंभू विचार दर्शन या संस्थांनी केले होते.

------