शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशामुळे बंधाऱ्याला धोका

By admin | Updated: December 30, 2016 04:33 IST

चिखली (ता. इंदापूर) येथे परिसरातील वाळूतस्करांनी नदीचे पात्र पोखरलेले आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडल्याने येथील बंधाऱ्यास धोका पोहोचला आहे.

वालचंदनगर : चिखली (ता. इंदापूर) येथे परिसरातील वाळूतस्करांनी नदीचे पात्र पोखरलेले आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडल्याने येथील बंधाऱ्यास धोका पोहोचला आहे. तसेच, पात्रातील मोठ्या खड्ड्यांमुळे पाण्याचा प्रवाहही बदलत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचत आहेत. त्यामुळे परिसरात होत असणाऱ्या अवैध वाळूउपशावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमा समजल्या जाणाऱ्या नीरा नदीवर जमिनी ओलिताखाली येण्यासाठी व पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नदीच्या पात्रात आठ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. परंतु, या परिसरात बेमाप अवैध वाळूउपसा होत आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी बंधाऱ्याचा पाया खचू लागला आहे. वेळीच येथील अवध्ौ वाळूउपशावर कारवाई केली नाही तर बंधारा कोसळण्याचीही भीती व्यक्त होत आहे. नदीत खड्डेच खड्डे असल्याने नदीच्या प्रवाहात बदल होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचून नदीच्या पात्रात भर पडत आहे. वाळूतस्करी चालू राहिल्यास नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी कमी होणार आहेत व कोल्हापुरी बंधारा ढासळणार आहे. त्यामुळे वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. (वार्ताहर)