शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाने मारले, कालव्याने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:20 IST

पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सध्या सुरू असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाने दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांना तारले आहे.या दोन्ही तालुक्यांतील १५ हजार ५५६ हेक्टर शेतीक्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे. सध्या हे आवर्तन सुरू आहे.संपूर्ण शेतीक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. मात्र, नीरा डाव्या कालव्याचे पाणी पोहोचू न शकणाºया भागाचा पाणीप्रश्न अद्याप गंभीरच आहे.बारामती उपविभागाचे उपअभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाची सुरुवात वितरिका क्रमांक ४६ पासून करण्यात आली.सध्या ४६ पासून वितरिका क्रमांक २५ पर्यंत आवर्तन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. १० आॅगस्टपर्यंत बारामती उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांचे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे.यामुळे परिसरातील शेतीपिकांना जीवदान मिळणार असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. त्यानंतर निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांमधून आवर्तन सोडले जाणार आहे . ६ सप्टेंबरपर्यंत शेतीसिंचनासाठी आवर्तन सुरू राहणार आहे, असे अकोसकर म्हणाले. पणदरे पाटबंधारे उपविभागाअंतर्गत असणाºया वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव, मळद परिसरात नीरा डाव्या कालव्याअंतर्गत एकूण ५७१८ हेक्टर शेतीक्षेत्र आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर शेतीला आवर्तन देण्यात आले आहे.८ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण आवर्तन पूर्ण होईल, अशी माहिती पणदरे पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता एस. एस. जगदाळे यांनी दिली.निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता आर. के. घोटुकडे म्हणाले, की निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत अंथुर्णे क्र. २, निमगाव केतकी १, बावडा शाखेअंतर्गत ५२०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी पाणी अर्ज घेण्याचे काम सुरू आहे.वितरिका क्रमांक ४९ ते ५९ चे आवर्तन १० आॅगस्टनंतर सुरू होणार आहे. सुरुवातीला शेती आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.या तलावात सोडण्यात येणाºया पाण्याबाबत धरणक्षेत्रात पडणाºया पावसावर अवलंबून आहे, असे घोटुकडे म्हणाले.दीड महिन्यापासून पावसाची दडीजून महिन्याच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर जवळपास दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. मात्र, वीर, भाटघर धरणक्षेत्रावर दमदार पाऊस सुरू आहे. पाणीसाठ्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. पावसाअभावी अडचणीतील शेतीला या आवर्तनाने तारले आहे. बारामती पाटबंधारे उपविभागाअंतर्गत बारामती, सणसर (ता. इंदापूर), अंथुर्णे क्र. १ तीन कार्यालये येतात. या तिन्ही शाखा कार्यालयांतर्गत ४६४८ हेक्टर शेतीक्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या हे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.