शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने मारले, कालव्याने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:20 IST

पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सध्या सुरू असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाने दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांना तारले आहे.या दोन्ही तालुक्यांतील १५ हजार ५५६ हेक्टर शेतीक्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे. सध्या हे आवर्तन सुरू आहे.संपूर्ण शेतीक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. मात्र, नीरा डाव्या कालव्याचे पाणी पोहोचू न शकणाºया भागाचा पाणीप्रश्न अद्याप गंभीरच आहे.बारामती उपविभागाचे उपअभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाची सुरुवात वितरिका क्रमांक ४६ पासून करण्यात आली.सध्या ४६ पासून वितरिका क्रमांक २५ पर्यंत आवर्तन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. १० आॅगस्टपर्यंत बारामती उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांचे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे.यामुळे परिसरातील शेतीपिकांना जीवदान मिळणार असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. त्यानंतर निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांमधून आवर्तन सोडले जाणार आहे . ६ सप्टेंबरपर्यंत शेतीसिंचनासाठी आवर्तन सुरू राहणार आहे, असे अकोसकर म्हणाले. पणदरे पाटबंधारे उपविभागाअंतर्गत असणाºया वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव, मळद परिसरात नीरा डाव्या कालव्याअंतर्गत एकूण ५७१८ हेक्टर शेतीक्षेत्र आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर शेतीला आवर्तन देण्यात आले आहे.८ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण आवर्तन पूर्ण होईल, अशी माहिती पणदरे पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता एस. एस. जगदाळे यांनी दिली.निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता आर. के. घोटुकडे म्हणाले, की निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत अंथुर्णे क्र. २, निमगाव केतकी १, बावडा शाखेअंतर्गत ५२०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी पाणी अर्ज घेण्याचे काम सुरू आहे.वितरिका क्रमांक ४९ ते ५९ चे आवर्तन १० आॅगस्टनंतर सुरू होणार आहे. सुरुवातीला शेती आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.या तलावात सोडण्यात येणाºया पाण्याबाबत धरणक्षेत्रात पडणाºया पावसावर अवलंबून आहे, असे घोटुकडे म्हणाले.दीड महिन्यापासून पावसाची दडीजून महिन्याच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर जवळपास दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. मात्र, वीर, भाटघर धरणक्षेत्रावर दमदार पाऊस सुरू आहे. पाणीसाठ्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. पावसाअभावी अडचणीतील शेतीला या आवर्तनाने तारले आहे. बारामती पाटबंधारे उपविभागाअंतर्गत बारामती, सणसर (ता. इंदापूर), अंथुर्णे क्र. १ तीन कार्यालये येतात. या तिन्ही शाखा कार्यालयांतर्गत ४६४८ हेक्टर शेतीक्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या हे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.