शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

पावसाने मारले, कालव्याने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:20 IST

पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सध्या सुरू असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाने दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांना तारले आहे.या दोन्ही तालुक्यांतील १५ हजार ५५६ हेक्टर शेतीक्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे. सध्या हे आवर्तन सुरू आहे.संपूर्ण शेतीक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. मात्र, नीरा डाव्या कालव्याचे पाणी पोहोचू न शकणाºया भागाचा पाणीप्रश्न अद्याप गंभीरच आहे.बारामती उपविभागाचे उपअभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाची सुरुवात वितरिका क्रमांक ४६ पासून करण्यात आली.सध्या ४६ पासून वितरिका क्रमांक २५ पर्यंत आवर्तन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. १० आॅगस्टपर्यंत बारामती उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांचे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे.यामुळे परिसरातील शेतीपिकांना जीवदान मिळणार असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. त्यानंतर निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांमधून आवर्तन सोडले जाणार आहे . ६ सप्टेंबरपर्यंत शेतीसिंचनासाठी आवर्तन सुरू राहणार आहे, असे अकोसकर म्हणाले. पणदरे पाटबंधारे उपविभागाअंतर्गत असणाºया वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव, मळद परिसरात नीरा डाव्या कालव्याअंतर्गत एकूण ५७१८ हेक्टर शेतीक्षेत्र आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर शेतीला आवर्तन देण्यात आले आहे.८ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण आवर्तन पूर्ण होईल, अशी माहिती पणदरे पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता एस. एस. जगदाळे यांनी दिली.निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता आर. के. घोटुकडे म्हणाले, की निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत अंथुर्णे क्र. २, निमगाव केतकी १, बावडा शाखेअंतर्गत ५२०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी पाणी अर्ज घेण्याचे काम सुरू आहे.वितरिका क्रमांक ४९ ते ५९ चे आवर्तन १० आॅगस्टनंतर सुरू होणार आहे. सुरुवातीला शेती आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.या तलावात सोडण्यात येणाºया पाण्याबाबत धरणक्षेत्रात पडणाºया पावसावर अवलंबून आहे, असे घोटुकडे म्हणाले.दीड महिन्यापासून पावसाची दडीजून महिन्याच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर जवळपास दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. मात्र, वीर, भाटघर धरणक्षेत्रावर दमदार पाऊस सुरू आहे. पाणीसाठ्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. पावसाअभावी अडचणीतील शेतीला या आवर्तनाने तारले आहे. बारामती पाटबंधारे उपविभागाअंतर्गत बारामती, सणसर (ता. इंदापूर), अंथुर्णे क्र. १ तीन कार्यालये येतात. या तिन्ही शाखा कार्यालयांतर्गत ४६४८ हेक्टर शेतीक्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या हे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.