शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

खरेदीत आयुक्तांच्या अधिकारांवरही गदा

By admin | Updated: August 12, 2016 01:16 IST

महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून २0१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी खरेदी करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदी प्रक्रियेत चक्क महापालिका आयुक्तांच्या आर्थिक अधिकारांवरही गदा

पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून २0१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी खरेदी करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदी प्रक्रियेत चक्क महापालिका आयुक्तांच्या आर्थिक अधिकारांवरही गदा आणण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खरेदीप्रक्रियेच्या निविदांसाठी ठेकेदारांकडून भरण्यात आलेली १ टक्का बयाणा (अनामत रक्कम) त्यांना काम पूर्ण होण्याआधीच परत देऊन त्यांच्याकडून ५ टक्के रक्कम एफडीआर ( फिक्स डीपॉझीट रिसिट) च्या माध्यमातून भरून घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात निविदाप्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर तसेच निविदाधारकाला कामाची वर्क आॅर्डर दिल्यानंतर अशाप्रकारे अटीमध्ये बदल करण्याचा अधिकार शिक्षण मंडळ प्रमुख म्हणून महापालिका आयुक्तांना आहे. त्यामुळे मंडळातील प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण मंडळाकडून खरेदी करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य अद्यापही मुलांना मिळाले नसल्याने तसेच ते निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी मुख्यसभेत करण्यात आल्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार, या खरेदीची चौकशी अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे. या खरेदीबाबत महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, साहित्य खरेदीची निविदा काढताना; नियमानुसार, बयाणा रक्कम १ टक्का, तर कामाचा करारनामा करण्यापूर्वी चार टक्के रक्कम संबंधित ठेकेदाकडून अनामत म्हणून घेणे आवश्यक आहे. मात्र, या खरेदीप्रक्रियेत बयाणा रक्कम १ टक्काच घेण्यात आली. डीडीच्या स्वरूपात घेण्यात आलेली ही रक्कम नंतर ठेकेदारांना परत देऊन त्यांच्याकडून ५ टक्के रक्कम घेण्यात आली. मंडळाकडून ही रक्कम घेतानाही त्यासाठी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने त्यासाठी पालिका आयुक्तांची मान्यता असणे आवश्यक होते. मात्र, चौकशीत अशा स्वरूपाचे कोणते बदल केले आहेत का, त्यास आयुक्तांनी कोणत्या मान्यता दिल्या आहेत का, याची कोणतीही माहिती शिक्षण मंडळाकडे नाही. त्यामुळे आपल्या पातळीवरच हा कारभार केल्याचे या अहवालातून निदर्शनास येत असून, हे अयोग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच अद्याप ठेकेदारांचे बिल अदा केले नसल्याने त्यांच्या बिलातून अनामत रक्कम कपात करून घेण्याची शिफारस या चौकशी अहवालात करण्यात आली. एखाद्या ठेकेदाराने दिरंगाई केल्यास, खराब साहित्य दिल्यास, अटींचा भंग केल्यास यांच्यावर दंडात्मक कारवाई करून या रकमेतून दंड वसूल केला जातो.