शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संवाद हरवल्याने जुळेनात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:14 IST

विवाहानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : विवाहानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. परंतु, कुटुंबातील, नात्यातील सुसंवाद हरपला आहे. एकमेकांना समजून घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विश्वास आणि सामंजस्याची भावना त्यांच्यात रुजत नाही. नात्यातील अन्य व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप, नवदाम्पत्यांमध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. अशा विविध कारणांमुळे उच्च शिक्षित, तसेच नवविवाहितांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याचा निष्कर्ष निघत असल्याचे मत समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या घटनांमध्ये नवविवाहित महिलांंच्या आत्महत्येच्या घटनांचा समावेश आहे. त्यातही उच्चशिक्षित महिला आणि नवविवाहित दाम्पत्य असल्याने चिंता व्यक्त होत आहे.हुंडा ही अनिष्ठ प्रथा नष्ट होण्यासाठी कायदा अंमलात आला. परंतु खोलवर रुजलेली प्रथा आजही समाजात आहेच. आयटीत काम करणाºया अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार, घरची आर्थिक सुबत्ता असताना, पत्नीच्या वडिलांनी हुंडा स्वरूपात काही तरी द्यावे. ही अपेक्षा त्या खोट्या प्रतिष्ठेपायी व्यक्त होत असते. हुंडा घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेल्याने सुश्क्षिित तरुणांकडून नवविवाहितांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. - अ‍ॅड़ मनीषा महाजनमाहेरहून पैसे आणावेत, अशी मागणी करून छळ केल्यामुळे पुनावळे येथे माधुरी किरण फडतरे हिने आत्महत्या केली. किरण फडतरे आणि माधुरी यांचा विवाह २०१४ मध्ये झाला. विवाहानंतर किरण याने माधुरीकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. छळाला कंटाळून माधुरीने २४ फेब्रुवारी २०१७ ला आत्महत्या केली़आयटी अभियंते यांना गलेलठ्ठ पगार असतो, तरीही पत्नीने माहेरहून पैसे आणावेत अशी अपेक्षा का बाळगली जाते? असा प्रश्न अशा घटना घडू लागल्याने उपस्थित होऊ लागला आहे.उच्चशिक्षित नवदाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार चिखली, मोरेवस्ती भागात उघडकीस आला. अनिकेत विलास ढमाले (वय २५), अश्विनी अनिकेत ढमाले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.>हुंड्याची प्रथा अजूनही रूजलेलीमाहेरहून पैसे आणावेत, यासाठी वारंवार तगादा लावला. तसेच पती व सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला. त्यामुळे प्रियंका इतेश शेंडगे या विवाहितेने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खडकी येथे घडली. २० डिसेंबर २०१५ ला तिचे इतेशबरोबर लग्न झाले होते. अवघ्या दोन वर्षांत तिने स्वत:ला संपविले.महिन्यापूर्वीच झाला होता विवाहनवविवाहितेने तिसºया मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतील भीमनगर येथे घडली. पुष्पा हर्षद लोखंडे (वय २८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नवविवाहितेने आत्महत्या केली. महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता.