शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीमुळे ५२ टक्के कंपन्यांचा कारभार अजूनही अडखळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्ण वाढ आणि टाळेबंदीची शक्यता यातून निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका उद्योग विश्वाला काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्ण वाढ आणि टाळेबंदीची शक्यता यातून निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका उद्योग विश्वाला काही प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांत पुण्यातील उद्योगविश्व सावरायला सुरुवात झाली होती. पण राज्यकर्ते आणि प्रशासनाने टाळेबंदीची चर्चा पुन्हा सुरु केली आणि त्याचा फटका उद्योगव्यवसायांना बसू लागला आहे. मार्च महिन्यात कंपन्यांच्या उत्पादनात दोन टक्क्यांची घट झाली आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातल्या ४८ टक्के कंपन्यांनी त्यांचे उत्पादन हे पूर्वपदावर आल्याचे म्हटले आहे. उर्वरित कंपन्यांनी पूर्वपदावर येण्यासाठी ३ ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले. दरम्यान रोजगाराचे प्रमाण मात्र फेब्रुवारी इतकेच म्हणजे ८६ टक्के राहिले आहे आहे. मात्र पुन्हा टाळेबंदी लागल्यास रोजगाराला आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाळेबंदी नकोच, अशी भूमिका मराठा चेंबरने घेतली आहे.

गेल्यावर्षीच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ‘मराठा चेंबर’ने केलेले हे बारावे सर्वेक्षण आहे. यात कोरोना साथीचा कंपन्यांवर झालेला परिणाम अभ्यासण्यात आला. आत्ता केलेल्या सर्वेक्षणामध्ये पुणे जिल्ह्यातील शंभर कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या सर्वेक्षणानुसार कंपन्यांचे उत्पादन हे फेब्रुवारीपेक्षा दोन टक्क्यांनी घटले. तसेच जानेवारी २०२० च्या उत्पादन पातळीवर यायला याच कंपन्यांना साधारण पुढचे तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सध्या ४८ टक्के कंपन्यांचे उत्पादन हे पूर्व पातळीवर आले आहे. एकूण १९ टक्के कंपन्यांच्या मते साधारण तीन महिन्यांमध्ये ते पूर्वपदावर येईल. तर १७ टक्के कंपन्याना मात्र यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकेल असे वाटते.

कोट

मराठा चेंबरचा ठाम विरोध

“पुन्हा टाळेबंदी लागल्यास उद्योग विश्व पुन्हा कोलमडेल. त्यामुळे टाळेबंदीला आमचा विरोध आहे. लसीकरण वाढवल्यास जास्तीत जास्त लोक उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतील.” -सुधीर मेहता, अध्यक्ष मराठा चेंबर.

कोट

“एप्रिल २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या सर्व सर्वेक्षणांमधून उद्योग विश्व पुन्हा उभे राहात असल्याचे चिन्ह दिसत होते. पण मार्चमध्ये याला थोडा फटका बसलेला दिसतो आहे. कंपनी जेवढी लहान तेवढा ती पूर्वपदावर येण्यास लागणारा वेळ जास्त आहे. त्यामुळेच सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”

-प्रशांत गिरबने, संचालक, मराठा चेंबर