शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे ५५ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या महिनाभराच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात २४ बाय ७ समान पाणीपुरवठा ...

पुणे : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या महिनाभराच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेतील ५५ किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करता आले आहे़

सदर योजनेत गेल्या दोन वर्षांपासून ४३२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम जलद गतीने करता आल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली़

शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुमारे ४० टक्के पाण्याची गळती होत असल्याने, ही गळती थांबविणे व शहराच्या सर्व भागात समान पाणी पुरवठा करण्यासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्यांचे जाळे तयार करावे लागत असून, शहराच्या मध्यवर्ती भागात विशेषत: बाजारपेठेच्या परिसरात वाहतूकोंडी न होता जलवाहिन्या टाकण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेला पेलणे सहज शक्य झाले़ लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता या वर्दळीच्या भागांत रस्ते खोदून जलवाहिन्या टाकणे आणि वाहतूक नियोजन करणे त्रासदायक ठरणारे होते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात वाहनांची व नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने या रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यावर प्रशासनाने भर दिल्याने, कोणत्याही अडथळ्याविना हे काम गेल्या महिनाभरात पार पडले आहे़

--

शहरासाठी २ हजार ५५० कोटी रुपयांची २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठीचे काम फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केले आहे. हे काम एल अ‍ॅण्ड टी आणि जैन इरिगेशन या कंपन्यांना दिले आहे. योजनेंतर्गत शहरात सर्वत्र नवीन जलवाहिनी टाकून ८० हून अधिक पाण्याच्या टाक्या बांधणार आहेत. तसेच सर्वत्र पाणी मीटरही बसविणार आहेत़