शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संस्काराच्या अभावाने वाढली टवाळखोरी

By admin | Updated: December 24, 2015 00:44 IST

विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकाऐवजी चाकू आणि सुरा, शिक्षकांना वाटते शाळेत जायला भीती..., शिक्षक ओरडल्यास जिवे मारण्याची धमकी

पिंपरी : विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकाऐवजी चाकू आणि सुरा, शिक्षकांना वाटते शाळेत जायला भीती..., शिक्षक ओरडल्यास जिवे मारण्याची धमकी..., हे वाचले की वाटेल की एखाद्या चित्रपटाची कथा आहे. पण, हे आहे महापालिकेच्या शाळेतील वास्तव चित्र. सभोवतालच्या गुंडाराज वातावरणाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत आहे. संस्काराअभावी विद्यार्थ्यांची वाढलेली टवाळखोरी रोखण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना आपलेसे करून प्रेम द्यावे, अशी अपेक्षा समुपदेशकांनी व्यक्त केली आहे. तर या मुलांचे समुपदेशन करणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.महापालिकेच्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विकृती वाढली आहे. शाळांच्या तक्रारींत मोठी वाढ झाली आहे. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक हैराण झाले आहेत. शिक्षक बोलल्याचा राग मनात धरून शिक्षकांना गुडांची टोळी आणून मारण्याची धमकी दिली जात आहे. तर, शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिक्षिकेच्या गाडीचे कव्हर फाडणे, तास सुरू असतानाच वर्गातून पळून जाणे, वर्गात गाणे म्हणणे, गाड्यांची हवा सोडणे असे प्रकार काही शाळांमध्ये सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरीगावातील शाळेतही वर्ग सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी बाइकची स्टंटबाजी करीत वाढदिवस रस्त्यावर साजरा केला. कासारवाडी शाळेतही तोच प्रकार घडला. खराळवाडी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनीही शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या डोक्यात दगड मारला. मुलांनी शाळेतील वस्तू घरी चोरून नेल्या. शाळेतील वस्तूंची तोडफोड केली. निगडी शाळेतही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. पिंपरी, काळभोरनग, निगडी शाळांमध्येही हेच वातावरण आहे. सभोवतालच्या वातावरणाचा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. त्यांच्या इतर ऊर्जेचा वापर झाला पाहिजे. समुपदेशनाची तत्काळ कार्यवाही होणार आहे. याकरिता मुख्याध्यापकांची बैठक घेतली आहे. सध्या महापालिका शाळा इतर उपक्रम राबविण्यात कमी पडत आहे, असे प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शिक्षक आणि पालकांनी सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून काम केले पाहिजे. मुलांच्या मानसिकतेत खूप फरक पडला आहे. पूर्वीच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडे पालकांचे आणि शाळांचे दुर्लक्ष झाले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपलेसे करायला हवे. संस्कार लावण्याच्या अंमलबजावणीत कडक बदल व्हायला हवा. आज घरात वडीलच विद्यार्थ्यांसमोर बसून दारू पिऊ लागले, तर मुलगा काय आदर्श घेणार? - धनंजय आष्टुरकर, मानसोपचारतज्ज्ञ