शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने केले २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 2, 2016 01:20 IST

राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमधील २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे

पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमधील २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या दोन वर्षांपासून आॅक्टोबर ते मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील रब्बीचे पीक वाया गेले होते; मात्र यंदा आॅक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राज्यातील हवामान चांगले होते. त्यामुळे यंदा तरी अवकाळी पाऊस पडणार नाही, असे चित्र होते; पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक राज्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग दाटून आले आणि प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान माजविले. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडला. यामुळे हाती आलेल्या रब्बीच्या पिकावर पाणी फेरले गेले.याबाबत देशमुख म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून, गारपीटही होत आहे. कालपर्यंत आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २८ हजार ८०५ हेक्टरवरील पिके खराब झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रब्बीचा गहू, हरभरा ही पिके आहेत. याचबरोबर केळी, संत्रा, चिकू या फळबागांचे आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. हा अंदाज प्राथमिक आहे.