शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने केले २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 2, 2016 01:20 IST

राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमधील २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे

पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमधील २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या दोन वर्षांपासून आॅक्टोबर ते मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील रब्बीचे पीक वाया गेले होते; मात्र यंदा आॅक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राज्यातील हवामान चांगले होते. त्यामुळे यंदा तरी अवकाळी पाऊस पडणार नाही, असे चित्र होते; पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक राज्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग दाटून आले आणि प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान माजविले. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडला. यामुळे हाती आलेल्या रब्बीच्या पिकावर पाणी फेरले गेले.याबाबत देशमुख म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून, गारपीटही होत आहे. कालपर्यंत आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २८ हजार ८०५ हेक्टरवरील पिके खराब झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रब्बीचा गहू, हरभरा ही पिके आहेत. याचबरोबर केळी, संत्रा, चिकू या फळबागांचे आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. हा अंदाज प्राथमिक आहे.