शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

अवकाळीने केले २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 2, 2016 01:20 IST

राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमधील २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे

पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमधील २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या दोन वर्षांपासून आॅक्टोबर ते मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील रब्बीचे पीक वाया गेले होते; मात्र यंदा आॅक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राज्यातील हवामान चांगले होते. त्यामुळे यंदा तरी अवकाळी पाऊस पडणार नाही, असे चित्र होते; पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक राज्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग दाटून आले आणि प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान माजविले. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडला. यामुळे हाती आलेल्या रब्बीच्या पिकावर पाणी फेरले गेले.याबाबत देशमुख म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून, गारपीटही होत आहे. कालपर्यंत आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २८ हजार ८०५ हेक्टरवरील पिके खराब झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रब्बीचा गहू, हरभरा ही पिके आहेत. याचबरोबर केळी, संत्रा, चिकू या फळबागांचे आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. हा अंदाज प्राथमिक आहे.