शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

अपक्षांच्या आशा संपुष्टात

By admin | Updated: January 11, 2017 03:49 IST

सदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक फटका अपक्षांना बसला आहे, एकट्याच्या बळावर चारच्या प्रभागातून निवडून येणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे

पुणे : चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक फटका अपक्षांना बसला आहे, एकट्याच्या बळावर चारच्या प्रभागातून निवडून येणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याऐवजी कोणत्या तरी पक्षाचा आधार घेऊन निवडणुका लढविण्यावर भर दिला जात आहे.महापालिकेची निवडणूक वॉर्डपद्धतीने पार पडत होती, त्या वेळी संबंधित भागामध्ये चांगली छाप असलेल्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली जात होती. स्वत:ची स्वतंत्र सुभेदारी निर्माण करण्यावर त्यांच्याकडून भर दिला जायचा. पालिकेमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळता त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास अपक्षांचा भाव भलताच वधारत असे. त्या जोरावर ती पालिकेतील महत्त्वाची पदे मिळविण्याचा प्रयत्न करीत.मागील वेळेस २ सदस्यीय प्रभाग पद्धतीने पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्या वेळी अश्विनी कदम या एकमेव नगरसेविका अपक्ष म्हणून निवडून येऊ शकल्या. यंदाचा दोनचा प्रभाग दुप्पट करून चार सदस्यीय बनविण्यात आला आहे. त्यामुळे मिनी विधानसभेचे मतदारसंघ तयार झाले आहेत. त्यामुळे ज्याची आमदार बनण्याची क्षमता आहे, तोच अपक्ष म्हणून नगरसेवक बनू शकणार आहे. (प्रतिनिधी)पैसे लाटण्यासाठीही काही जण राहतात उभेअपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायचा. त्यानंतर संबंधिताने अर्ज मागे घ्यावा यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून गळ घातली जाते. तेव्हा त्या उमेदवारांकडून थोडेफार पैसे घेऊन माघार घ्यायची असे प्रकारही काही अपक्ष उमेदवारांकडून केले जात असल्याचे दिसून आले आहे. निवडून येण्याऐवजी  पाडण्यासाठी उभे राहतात अपक्षअनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते खाण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले जातात. एखाद्या परिसरातील एकगठ्ठा मते आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू शकतील असे वाटल्यास त्या भागातील गणेश मंडळाचा अध्यक्ष किंवा एखाद्या कार्यकर्त्याला मुद्दामहून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास सांगितले जाते. त्यातून प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते खाण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या भागातील मते आपल्याला मिळणारच नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर अशा प्रकारचे डावपेच लढविले जातात. त्यामुळे अपक्ष उमेदवार हे बऱ्याचदा निवडून येण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी उभे केले जातात.अपक्ष म्हणून निवडून येऊ असा विश्वासराजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये व्यवस्थित लक्ष देत नाहीत. नगरसेवकांकडे प्रश्न घेऊन गेल्यावर ते सांगतात, ‘‘आम्ही पैसे देऊन निवडून आलो आहोत, आता आम्ही तुमची कामे करणार नाही.’’ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. मी गेल्या ५ वर्षांत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. - भरत सुराणा, अपक्ष उमेदवार, महर्षीनगर