शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पावसाची हुलकावणी : जव्हार, मोखाडा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 02:28 IST

गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात पीक संकटात आले असून जव्हार व मोखडा तालुक्यावर दुष्काळाचं सावट पसरले आहे.

मोखाडा : गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात पीक संकटात आले असून जव्हार व मोखडा तालुक्यावर दुष्काळाचं सावट पसरले आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने हळव्या भातासह गरव्या भात पिकाला दिलासा मिळाल परंतु असे असले तरी करपा, खोडकीडा, बगळया या रोगाचा फटका पिकांना बसला आहे.पावसाची हुलकावणी, वाढते उन्ह आणि रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतीवर दोन्ही तालुक्यात संकट आहे. ऐन भात पीक तयार होण्यासाची प्रक्रि या सुरू असताना आवश्यक पाऊस शेतीला मिळाला नसल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर करपलेले भात, जमिनीला पडलेल्या भेगा जणूकाही दुष्काळच चित्र दर्शवित आहे.मोखाड्यात २५९ गावपाडे असून नागली, भात, वरई, खुरासनी, कुळीद, उडीद, तूर आदी पिके घेतली जातात परंतु यामधील भात हे पीक प्रामुख्याने घेतले जात असून २ हजार ३७ हेक्ट्रर जमिनीवर भाताची लागवड होते. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची लागवड करण्यात आली परंतु येथील वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती सध्या धोक्यात आले आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.निसर्गापुढे शेतकरी मेटाकुटीलादरवर्षीच शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्याच्यापुढे आहे. अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची की नाही असा प्रश्न पुढे येऊन ठाकला आहे..!

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या