शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बागायती भागातही दुष्काळाची दाहकता

By admin | Updated: March 13, 2016 01:31 IST

आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे

सोमेश्वरनगर : आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे. यामुळे शेकडो एकर ऊस जळाला आहे. महिन्यापूर्वी नीरा डावा कालवा बंद झाल्यापासून वीर धरण ते इंदापूरपर्यंतच्या बागायती पट्ट्यातही पाण्याची कमतरता भासू लागली. हळूहळू ही कमतरता तीव्र होऊ लागली. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिके सोडून दिली आहेत. बोरवेल पूर्ण बंद झाली असून, २४ तास मोटारी चलणाऱ्या विहिरी अर्धा ते एक तासावर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्यांना तुटून जाणे बाकी आहे. तुटून जाणाऱ्या उसाला पाणी द्यावे की लहान ऊस जगवावा, हे समजत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे तर पाणीच नसल्याने त्यांची पिके पूर्णत: जळाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यापूर्वी उसाची पिके भिजवली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या उसाला पाणी मिळालेले नाही. तुटून जाणाऱ्या उसाला पाणीच नसल्याने खोडवा उसाचे एकरी टनेज ३० वर आले आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याकडे दीड लाख टन, माळेगाव कारखान्याकडे एक लाख टन तर छत्रपती कारखान्याकडे अजून ७० हजार टनांच्या आसपास ऊस शिल्लक आहे. हा ऊस लवकरात लवकर गाळप करण्यासाठी शेतकी विभाग डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. सोमेश्वर कारखान्याने नुकताच दौंड शुगर कारखान्याशी ५० हजार टनांचा करार केला आहे. महसूलमंत्र्यांबरोबर बैठक होणे अपेक्षित होते; त्यांच्या अपुऱ्या वेळेमुळे बैठक होऊ शकली नाही. आता पुण्याचे पालकमंत्री बापट यांच्या निर्देशनानुसार नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन प्रस्तावित आहे. - विजय नलवडे,उपअभियंता, नीरा डावा कालवा