शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बागायती भागातही दुष्काळाची दाहकता

By admin | Updated: March 13, 2016 01:31 IST

आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे

सोमेश्वरनगर : आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे. यामुळे शेकडो एकर ऊस जळाला आहे. महिन्यापूर्वी नीरा डावा कालवा बंद झाल्यापासून वीर धरण ते इंदापूरपर्यंतच्या बागायती पट्ट्यातही पाण्याची कमतरता भासू लागली. हळूहळू ही कमतरता तीव्र होऊ लागली. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिके सोडून दिली आहेत. बोरवेल पूर्ण बंद झाली असून, २४ तास मोटारी चलणाऱ्या विहिरी अर्धा ते एक तासावर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्यांना तुटून जाणे बाकी आहे. तुटून जाणाऱ्या उसाला पाणी द्यावे की लहान ऊस जगवावा, हे समजत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे तर पाणीच नसल्याने त्यांची पिके पूर्णत: जळाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यापूर्वी उसाची पिके भिजवली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या उसाला पाणी मिळालेले नाही. तुटून जाणाऱ्या उसाला पाणीच नसल्याने खोडवा उसाचे एकरी टनेज ३० वर आले आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याकडे दीड लाख टन, माळेगाव कारखान्याकडे एक लाख टन तर छत्रपती कारखान्याकडे अजून ७० हजार टनांच्या आसपास ऊस शिल्लक आहे. हा ऊस लवकरात लवकर गाळप करण्यासाठी शेतकी विभाग डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. सोमेश्वर कारखान्याने नुकताच दौंड शुगर कारखान्याशी ५० हजार टनांचा करार केला आहे. महसूलमंत्र्यांबरोबर बैठक होणे अपेक्षित होते; त्यांच्या अपुऱ्या वेळेमुळे बैठक होऊ शकली नाही. आता पुण्याचे पालकमंत्री बापट यांच्या निर्देशनानुसार नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन प्रस्तावित आहे. - विजय नलवडे,उपअभियंता, नीरा डावा कालवा