शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोनाच्या निर्बंधामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

कोरोनाच्या निर्बंधामुळे शेतीमालाला मागणी घटली : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बारामती : कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध जाहीर ...

कोरोनाच्या निर्बंधामुळे

शेतीमालाला मागणी घटली : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बारामती : कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार शासनाने आठवडे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे बाजारात एकाच दिवशी होणारा भाज्यांचा खप कमालीचा घटला आहे.त्याचा भाजीउत्पादक,फलोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

आठवडे बाजार हे शेतीमालासाठी सर्वाधिक मोठी बाजारपेठ आहे.एखाद्या मॉलप्रमाणे या ठिकाणी एकाच वेळी सर्व प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या, फळे,खाद्यपदार्थ योग्य दरात उपलब्ध असतात. यामध्ये शेतकरी स्वत देखील त्यांच्या शेतातील माल विक्रीला आणतात. भाजीविक्रेते ते बाजार समितीच्या लिलावात भाजीपाला मोठ्या प्रमाणावर खरेदी करुन बाजारात त्याची विक्री करतात. या एकाच दिवशी भाजीपाल्याची उलाढाल काही लाखांमध्ये होते. मात्र, कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन ’अंतर्गत च्या निर्बंधामुळे लागू केलेल्या नियमांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत.त्याचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

याबाबत बारामती येथील श्रीगणेश भाजी मंडई संघटनेचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आठवडे बाजार बंद असल्याने शेतीमालाला उठाव राहिलेला नाही. आठवडे बाजारात शेतीमालाची दुप्पट, तिप्पट विक्री होते.आठवडे बाजारात शेतीमालाला मोठी मागणी असते. मात्र, तो बंद असल्याने या मालाच्या विक्रीवर परीणाम झाले आहे. किरकोळ भाजीविक्रेत्यांची ,फेरी विक्रेत्यांची संंख्या वाढली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना देखील अपेक्षित प्रमाणात उत्पन्न मिळत नाही,असे जंजिरे म्हणाले.

———————————————————

...परवडणारा आंबा बाजारातून गायब

लॉकडाऊनसदृश स्थितीमुळे बदाम,लालबाग,पायरी आदी परवडणाऱ्या आंब्याची खरेदी विक्रेत्यांनी कोरोनाच्या परिस्थितीमुळे केलेली नाही. त्यामुळे बाजारात यंदा हे परवडणारे आंबे अद्याप दिसून येत नाही. ६०० ते ८०० रूपये डझन दराने हे आंबे बाजारात विक्री करण्यात येत आहेत.

—————————————————

फोटोओळी—कोरोनामुळे भाजीविक्रेत्यांकडे ग्राहकांची तुरळक गर्दी होत आहे.

१५०४२०२१बारामती—१८

————————————