शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

टोलविरोधातील बंदमुळे उद्योगनगरीत मालवाहतूक ठप्प

By admin | Updated: October 2, 2015 00:43 IST

देशभरातील माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरी पिंपरी- चिंंचवडला बसला. गुरुवारी मालवाहतूक ठप्प झाली होती.

पिंपरी : देशभरातील माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरी पिंपरी- चिंंचवडला बसला. गुरुवारी मालवाहतूक ठप्प झाली होती. देशभरातील टोल बंद करावा, या मागणीसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे. बंदचा गुरुवारचा पहिला दिवस होता. बंदला प्रतिसाद देत निगडीतील ट्रान्सपोर्टनगर, तळवडे, चिखली, ताथवडे, दिघी, विश्रांतवाडी, चाकण आदी ठिकाणच्या जवळपास आठ हजार मालवाहतूक गाड्या बंद आहेत. ट्रान्सपोर्टनगरीत ट्रॅक, ट्रॉली आणि अवजड वाहने सकाळपासून थांबून होती. त्यावरील चालक आणि क्लिनर बसून होते. मालवाहतूक बंदमुळे औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे. मालाची ने-आण न झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. विशेषत: मोठे उद्योग आणि कारखान्यावर त्याचा अधिक परिणाम जाणवणार आहे. या संदर्भात आॅल इंडिया ट्रान्सपोर्ट कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, ‘‘शहरासह राज्यातील संघटनेला संलग्न शाखा बंदमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे जवळजवळ सर्वच गाड्या एका ठिकाणी थांबल्या आहेत. मालवाहतूक पूर्णपणे बंद आहे. जोपर्यंत टोलची वसुली बंद होत नाही, तोपर्यंत बंद सुरू राहील. टोलमुळे माल वाहतूक करणे अधिक गैरसोईचे, तसेच आर्थिक भुर्दंड देणारे ठरत आहे. टोल त्वरित बंद करून माल वाहतूकदारांना केंद्र सरकारने दिलासा द्यावा.’’ (प्रतिनिधी)