शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे ३० ते ४० टक्केच कांदा लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव ढमढेरे : यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे कांदा पीक वाया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेगाव ढमढेरे : यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे कांदा पीक वाया गेल्याने दर वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या हंगामात साधारण तीस ते चाळीस टक्केच कांदा लागवडी झाल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. यावर्षी कांद्याला बाजारभाव समाधानकारक असला तरी शेतकऱ्यांच्या हाती मालच नसल्याने शिरूर तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरवर्षी बळीराजा ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान कांदा रोपे तयार करण्याची प्रक्रिया करीत असतो. ही रोपे तयार झाल्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान शेतकरी वर्ग कांद्याच्या रोपांची लावणी (लागवड) करतात. या वर्षीच्या कांदा रोप प्रक्रियेच्या दरम्यान निसर्ग कोपल्याने पावसाच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलाने अक्षरशः अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याची रोपे वाहून गेली. तर काही शेतकऱ्यांची रोपे अनेक दिवस पाणी साठून राहिल्याने जाग्यावरच सडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षीच्या तुलनेत शिरूर तालुक्‍यात या वर्षी कांद्याचे पीक साधारण तीस ते चाळीस टक्केच दिसून येत आहे. सध्या अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन कांदा साधारण ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करीत आहेत. शेतकरी वर्गास कांद्याला बाजार भाव समाधानकारक मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या शेतात माल नसल्याने शेतकरी वर्ग मात्र हतबल झाल्याने आर्थिक विळख्यात सापडला आहे. विशेषता बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा पिकांवर आर्थिक नियोजन ठरलेले असते. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

चौकट:

या वर्षीच्या हंगामात ऑगस्टच्या दरम्यान दहा हजार रुपये पायलीप्रमाणे दोन पायल्यांचे कांदा बियाणे वीस हजार रुपये किमतीला खरेदी करून रोप प्रक्रियेसाठी शेतात लावले. परंतु तयार झालेली रोपे पावसाच्या अतिवृष्टीमुळे अक्षरश: वाहून गेली तर काही रोपे जाग्यावरच सडली गेली. तरीदेखील खचून न जाता शेवटच्या टप्प्यात अर्धा एकर पुन्हा कांदा रोपांची लागवड केली. परंतु त्यातीलही निम्मा कांदा सडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

-आबू भोसले (प्रगतशील शेतकरी, दरेकरवाडी)

फोटो ओळ: विठ्ठलवाडी येथे कांदा खरेदी करताना व्यापारी.