शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारकडून पुण्याला दुजाभाव

By admin | Updated: May 26, 2015 01:21 IST

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील महायुतीच्या सरकारने विकास प्रकल्पामध्ये पुण्याला दुजाभावाची वागणूक दिली आहे.

पुणे : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील महायुतीच्या सरकारने विकास प्रकल्पामध्ये पुण्याला दुजाभावाची वागणूक दिली आहे. पुण्यात प्रस्तावित प्रकल्प नागपूरला नेण्याचा घाट घातला आहे, अशी टीका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने (जेएनएनयुआरएम) अंतर्गत पुण्यातील प्रकल्पांसाठी सुमारे दोन हजार कोटींचा निधी मिळाला. मात्र, गेल्या वर्षभरात पुण्यातला एकही रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेला नाही. पुणेकरांनी शहरात आठ आमदार निवडून दिले. शहरात तीन मंत्री आहेत. तरीही पुण्याचा मेट्रो प्रकल्प मागे ठेवून नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. पुण्यात प्रस्तावित आयआयएम नागपूरला आणि उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला नेले. पुण्याचे पर्यावरण मंत्री असूनही नदीसुधारणाचे विषय प्रलंबित आहे, अशी टीका शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे व महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत आज केली. ते म्हणाले, की स्मार्टसिटीचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने वर्षभरात मार्गदर्शक तत्त्वेही तयार केलेली नाहीत. टोलबाबत निश्चित धोरण नाही. रेल्वे अंदाजपत्रकात पुण्यासाठी एकही गाडी सुरू केलेली नाही. गेल्या वर्षभरातील सरकारचा कारभार निराशाजनक आहे. त्यामुळे उद्या (मंगळवारी) वर्षेपूर्तीनिमित्ताने शहर काँग्रेसतर्फे नरपतगिरी चौकात सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)