शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

विकास आराखड्याबाबत राज्य सरकारची दुटप्पी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने २३ गावांचा महापालिकेत समावेश करणे व विकास आराखड्यासाठी पुणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने २३ गावांचा महापालिकेत समावेश करणे व विकास आराखड्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) नियुक्ती करणे अशी दुटप्पी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर असून, याविरोधात आम्ही कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेऊ,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार महापालिकेकडून काढून ते पीएमआरडीएला देण्याच्या राज्य सरकारच्या आदेशासंदर्भात महापौर पत्रकार परिषदेत बोलत होते. सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते.

समाविष्ट २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी पीएमआरडीएची नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करून राज्य शासनाने महापालिकेच्या अधिकारावर गदा आणली आहे. राज्य शासनाला गावांच्या विकासाची एवढीच काळजी होती, तर आराखडा मान्य करूनच गावे पालिकेच्या ताब्यात द्यायची होती. केवळ आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाईगडबडीत घेतलेल्या या दुहेरी आणि बेकायदा निर्णयामुळे गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका गुरूवारी सर्वसाधारण सभेत समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा इरादा जाहीर करण्याचा निर्णय घेणारच आहे. कायदेशीर अडचणी पुढील कार्यवाही करू, असे मोहोळ यांनी सांगितले.

चौकट

कचरा उचलण्यासाठी फक्त महापालिका

“महापालिकेच्या इतिहासातील आजचा हा काळा दिवस असून, राज्य सरकारने महापालिकेच्या मूलभूत अधिकारांवरच राज्य सरकारने घाला घातला,” असा आरोप सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केला. राज्य शासनाच्या या आदेशात तांत्रिक त्रुटी असून केवळ बेकायदेशीररित्या महापालिकेला विकास आराखडा तयार करण्यापासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

समाविष्ट गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार ‘पीएमआरडीए’कडेच राहाणार असून कचरा उचलणे, पाणी पुरवठा करणे ही जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे. ‘पीएमआरडीए’ नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहाणार असेल, तर अन्य प्राथमिक सुविधा पुरवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच ठेवावी, असे बिडकर यांनी सांगितले़

---------------------