शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईतही शहरात पाण्याचा ‘सुकाळ’

By admin | Updated: September 4, 2015 02:22 IST

शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही

पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महापालिकेने दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर शहरात पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे असंख्य फोन कॉल्स येत आहेत. पाण्याचा गैरवापर केल्यास पुणेकरांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा देणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा झाला आहे, या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी वर्षभर वापरण्याचे आव्हान शहरासमोर उभे ठाकले आहे. पाण्याची आणीबाणी निर्माण झाल्यानंतर झोपेतून जागे झालेले पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता कामाला लागले आहेत. येत्या वर्षभरात मोठ्या पाणीकपातीला शहराला सामोरे जावे लागणार आहे.आयडियल कॉलनीतील विजया पांडे यांनी बॉम्बे स्टेशनरीजवळ ४ महिन्यांपासून पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे कळविले आहे. कस्तुरबा वसाहतीमध्ये मोटारी बसवून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे नगरसेवक कैलास गायकवाड यांनी फोन करून कळविले आहे. पर्वती दर्शन येथील साईबाबा मंदिराजवळ दिवसरात्र पाणी वाहत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली आहे. दत्तवाडी येथील पाण्याच्या टाकीतून सतत पाणी गळती होत असल्याची तक्रार आली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन, टाक्या येथून पाणीगळती होत असल्याची माहिती नागरिकांकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिली जाते; मात्र त्याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच नळकनेक्शन तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी करणाऱ्या प्रशासनावर आयुक्त कधी कारवाई करणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी भिडे पुलाजवळ पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाइपलाइन फुटून अनेक तास उलटले तरी पाणीपुरवठा विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी आला नव्हता. शहरामध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण झाली असताना पाणीपुरवठा विभागाकडून होत असलेल्या या निष्काळजीपणाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.गळती, गैरवापर दिसला तर लगेच फोन कराशहरामध्ये कुठेही पाण्याचा गैरवापर होत असल्याचे तसेच गळती होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर महापालिकेस माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे.गणेश खिंड रस्त्यावरील खैरेवाडी येथे मेनलाइनमधून पाणी वाहात असल्याची माहिती बोडके यांनी दिली आहे. येरवडा येथील राज चौकामध्ये पाणीगळती होत असल्याचे फिरोज शेख यांनी कळविले आहे. ससून कॉलनीमध्ये पाण्याच्या टाक्यांमधून अनेक वर्षांपासून पाणी गळती होत आहे.