शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

टंचाईतही शहरात पाण्याचा ‘सुकाळ’

By admin | Updated: September 4, 2015 02:22 IST

शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही

पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महापालिकेने दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर शहरात पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे असंख्य फोन कॉल्स येत आहेत. पाण्याचा गैरवापर केल्यास पुणेकरांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा देणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा झाला आहे, या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी वर्षभर वापरण्याचे आव्हान शहरासमोर उभे ठाकले आहे. पाण्याची आणीबाणी निर्माण झाल्यानंतर झोपेतून जागे झालेले पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता कामाला लागले आहेत. येत्या वर्षभरात मोठ्या पाणीकपातीला शहराला सामोरे जावे लागणार आहे.आयडियल कॉलनीतील विजया पांडे यांनी बॉम्बे स्टेशनरीजवळ ४ महिन्यांपासून पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे कळविले आहे. कस्तुरबा वसाहतीमध्ये मोटारी बसवून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे नगरसेवक कैलास गायकवाड यांनी फोन करून कळविले आहे. पर्वती दर्शन येथील साईबाबा मंदिराजवळ दिवसरात्र पाणी वाहत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली आहे. दत्तवाडी येथील पाण्याच्या टाकीतून सतत पाणी गळती होत असल्याची तक्रार आली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन, टाक्या येथून पाणीगळती होत असल्याची माहिती नागरिकांकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिली जाते; मात्र त्याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच नळकनेक्शन तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी करणाऱ्या प्रशासनावर आयुक्त कधी कारवाई करणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी भिडे पुलाजवळ पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाइपलाइन फुटून अनेक तास उलटले तरी पाणीपुरवठा विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी आला नव्हता. शहरामध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण झाली असताना पाणीपुरवठा विभागाकडून होत असलेल्या या निष्काळजीपणाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.गळती, गैरवापर दिसला तर लगेच फोन कराशहरामध्ये कुठेही पाण्याचा गैरवापर होत असल्याचे तसेच गळती होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर महापालिकेस माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे.गणेश खिंड रस्त्यावरील खैरेवाडी येथे मेनलाइनमधून पाणी वाहात असल्याची माहिती बोडके यांनी दिली आहे. येरवडा येथील राज चौकामध्ये पाणीगळती होत असल्याचे फिरोज शेख यांनी कळविले आहे. ससून कॉलनीमध्ये पाण्याच्या टाक्यांमधून अनेक वर्षांपासून पाणी गळती होत आहे.