शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कोरडा पडलेला खाटपेवाडी तलाव बनलाय पाणीदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

पुणे : दोन वर्षांपूर्वी खाटपेवाडी तलाव कोरडा पडलेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्यात गाळ साठला होता. तो गाळ काढून ...

पुणे : दोन वर्षांपूर्वी खाटपेवाडी तलाव कोरडा पडलेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्यात गाळ साठला होता. तो गाळ काढून तिथली जागा मोकळी केली. त्यानंतर तिथे आज लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. आजूबाजूच्या विहिरींचा जलस्तरही वाढला आहे. त्यामुळे खाटपेवाडी तलावाने सर्वांच्या घरांमध्ये सुख-समृध्दीचा प्रवाह आणला आहे. तलावाच्या बाजूने झाडं लावल्याने पक्ष्यांची संख्याही वाढली आहे. यासाठी ग्रामस्थांनही सहभाग घेऊन हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

‘राम नदी पुनरुज्जीवन अभियान’अंतर्गत ‘किर्लोस्कर वसुंधरा’च्या वतीने खाटपेवाडी तलावाला नवसंजीवनी दिली आहे. दोन वर्षांमध्ये या तलावाचा कायापालट झाला असून, आज देखील तलावात ४० टक्के पाणीसाठा आहे. जोपूर्वी या वेळेला कोरडा पडलेला असायचा. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या १२ संस्था, ३३ महाविद्यालये, २५ शाळा, शंभर तज्ज्ञ, किर्लोस्कर कंपन्यांमधील कामगारांच्या सहयोगाने ही चळवळ सुरू केली आहे. रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी हे सर्व प्रयत्न करत आहेत. या नदीच्या उगमस्थानी खाटपेवाडी तलाव आहे. तलावाकाठी वृक्षारोपण केले होते. ती झाडे आता उंच झाली असून, त्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती अभियानाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

खाटपेवाडी तलाव हा १९७२ साली दुष्काळ पडला तेव्हा तयार करण्यात आला होता. त्यानंतर एकदाही या तलावाचे खोलीकरण किंवा गाळ काढण्यात आला नव्हता. परिणामी त्यात खूप गाळ साठत गेला आणि पाणी साठा कमी होत गेला. ही स्थिती असताना ३०० ट्रक येथील गाळ काढून तो तलावाच्या बाजूने टाकण्यात आला. त्यावर वृक्षारोपण करण्यात आले असून, तिथे सोमवारी स्मृती मार्ग तयार करण्यात येत आहे, असे चित्राव यांनी सांगितले.

————————-

आज ‘स्मृती मार्गा’चे उद‌्घाटन

खाटपेवाडी तलावाच्या उजव्या कडेला वृक्षारोपण-संवर्धनाचा कार्यक्रम सोमवारी होत आहे. कोरोना महामारीमुळे भुकूम गावातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या नावाने ‘स्मृती मार्ग’ तयार होणार आहे. त्यासाठी सोमवारी तिथे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, भुकूम सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन आंग्रे उपस्थित राहतील.