कुरुळी : राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूची साथ पसरून घबराट पसरली आहे. यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता सुरक्षा उपाय म्हणून पाणी साठवणो टाळायला हवे.
घरातील पाणी साठवणुकीचे पिंप आठवडय़ातून एकदा पालथे करून, पूर्ण रिकामे करून स्वच्छ करायला हवी. एकंदरीतच डेंग्यूच्या डासांचा बंदोबस्त नागरिकांनीच करायला हवा, असे आव्हान कुरुळीच्या सरपंच प्रमिला मु:हे यांनी केले.
डेंग्यूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असल्याने गावपातळीवर अनेक ग्रामपंचायती धुरळणी व औषध फवारणी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून येथे औषध फवारणी करण्यात आली. कुरुळी येथील ग्रामपंचायतीतर्फे गायकवाड, घाडगे वस्ती, सोनवणोवस्ती, गावठाण, कांबळेवस्ती आदी ठिकाणी फॉगिंग मशिनने औषध फवारणी, जंतुनाशक पावडर टाकून प्रतिबंधक उपाय केले आहेत. पुढील काळात दर आठ दिवसांतून एकदा फवारणी करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास अधिकारी छाया इरनक यांनी सांगितले.
उपसरपंच बेबीताई कड, माजी सरपंच आशा सोनवणो, तेजस्विनी बागडे, आशिष मु:हे, एकनाथ सोनवणो, नितीन गायकवाड, मारुती मु:हे, बाळासाहेब बागडे, संजय बधाले, पांडुरंग गुरव, आनंद बागडे, शुभांगी कांबळे, कमर्चारी उपस्थित होते.
डेंगी एनएस-1 या रक्तचाचणीतून नेमके निदान होते. तसेच पाचव्या दिवसानंतर दुस:या दोन रक्त तपासण्यांतून नेमके निदान होते. त्याचा निष्कर्ष काहीही आला, तरी उपचार बदलत नाहीत. उपचार फक्त हिमोग्राम व रुग्णात दिसणारी लक्षणो यावर अवलंबून असतात. त्यामुळे सरसकट या चाचण्या करण्यात अर्थ नाही. पोटात, छातीत पाणी, मूत्नपिंड, यकृत यांना इजा हे ओळखण्यासाठीच्या तपासण्या आहेत. पण, गुंतागुंत डेंग्यू झालेल्या फक्त काही जणांमध्येच त्याची खरी गरज असते. सर्व शास्त्न गुंडाळून अनेक ठिकाणी अकारण तपासण्या करण्याचा मारा चालू आहे. निदान रुग्णांनी त्याची मागणी करू नये.
- डॉ. कुलदीप पवार