शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

खोर परिसरावर दुष्काळ अधिक गडद

By admin | Updated: March 11, 2016 01:45 IST

जनावरांना खायला डोंगरमाथ्यावरील वाळलेला चारा... पाण्याअभावी वाळून गेलेल्या फळबागा..एकाच टँकरचे रात्रीच्या वेळीदेखील कधीही होणारे आगमन.

खोर : जनावरांना खायला डोंगरमाथ्यावरील वाळलेला चारा... पाण्याअभावी वाळून गेलेल्या फळबागा..एकाच टँकरचे रात्रीच्या वेळीदेखील कधीही होणारे आगमन. पाण्याच्या ढिसाळ नियोजनाअभावी गाढ झोपेतून खडबडून जागे होऊन पाणी भरण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या रांगा... कोरड्याठाक पडलेल्या विहिरी... अशा गंभीर परिस्थितीत खोर (ता. दौंड) परिसर सापडला आहे. एकंदरीतच, खोर परिसरावर दुष्काळाचे गंभीर सावट जाणवत आहे. पाणीटंचाईच्या गंभीरस्थितीमुळे दैनिक व्यवहार, जनजीवन ढासळले असल्याचे चित्र आहे. एकीकडे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अंजीर, डाळिंब यांच्या फळबागा सुकून गेल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. या भागातील शेतकरीवर्गाचा आधार असलेल्या शेततळ्यांमधीलदेखील पाणी संपुष्टात आले असल्याने शेती पडीक ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या दुष्काळी भागाची छाया आणखीणच गडद होण्याआधी पुरंदर जलसिंचन योजना अथवा जनाई-शिरसाईसारख्या योजना कार्यान्वित करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली आहे. सिंचनाच्या योजना खोर परिसराच्या उशाशी असूनदेखील या योजनांचा लाभ घेण्यापासून हा परिसर वंचितच राहिला आहे. लवकरात लवकर या योजना कार्यान्वित करून एखादे आवर्तन डोंबेवाडी पाझर तलावात अथवा फडतरेवस्ती तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. पाणीप्रश्न गंभीर बनला असून, पंचायत समितीकडून पाण्याचा एक टँकर सुरू आहे. मात्र, तालुक्याच्या इतर भागांमध्येदेखील पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने व पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या ढिसाळ नियोजनामुळे कधीही टँकर खेपा घेऊन खोर परिसरामधील वाड्यावस्त्यांवर येत आहे. महिलांना रात्रीच्या वेळी रांगा लावून पाणी भरण्याची वेळ आली आहे.