शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खोर परिसरावर दुष्काळ अधिक गडद

By admin | Updated: March 11, 2016 01:45 IST

जनावरांना खायला डोंगरमाथ्यावरील वाळलेला चारा... पाण्याअभावी वाळून गेलेल्या फळबागा..एकाच टँकरचे रात्रीच्या वेळीदेखील कधीही होणारे आगमन.

खोर : जनावरांना खायला डोंगरमाथ्यावरील वाळलेला चारा... पाण्याअभावी वाळून गेलेल्या फळबागा..एकाच टँकरचे रात्रीच्या वेळीदेखील कधीही होणारे आगमन. पाण्याच्या ढिसाळ नियोजनाअभावी गाढ झोपेतून खडबडून जागे होऊन पाणी भरण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या रांगा... कोरड्याठाक पडलेल्या विहिरी... अशा गंभीर परिस्थितीत खोर (ता. दौंड) परिसर सापडला आहे. एकंदरीतच, खोर परिसरावर दुष्काळाचे गंभीर सावट जाणवत आहे. पाणीटंचाईच्या गंभीरस्थितीमुळे दैनिक व्यवहार, जनजीवन ढासळले असल्याचे चित्र आहे. एकीकडे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अंजीर, डाळिंब यांच्या फळबागा सुकून गेल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. या भागातील शेतकरीवर्गाचा आधार असलेल्या शेततळ्यांमधीलदेखील पाणी संपुष्टात आले असल्याने शेती पडीक ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या दुष्काळी भागाची छाया आणखीणच गडद होण्याआधी पुरंदर जलसिंचन योजना अथवा जनाई-शिरसाईसारख्या योजना कार्यान्वित करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली आहे. सिंचनाच्या योजना खोर परिसराच्या उशाशी असूनदेखील या योजनांचा लाभ घेण्यापासून हा परिसर वंचितच राहिला आहे. लवकरात लवकर या योजना कार्यान्वित करून एखादे आवर्तन डोंबेवाडी पाझर तलावात अथवा फडतरेवस्ती तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. पाणीप्रश्न गंभीर बनला असून, पंचायत समितीकडून पाण्याचा एक टँकर सुरू आहे. मात्र, तालुक्याच्या इतर भागांमध्येदेखील पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने व पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या ढिसाळ नियोजनामुळे कधीही टँकर खेपा घेऊन खोर परिसरामधील वाड्यावस्त्यांवर येत आहे. महिलांना रात्रीच्या वेळी रांगा लावून पाणी भरण्याची वेळ आली आहे.