शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘अवकाळी’ग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By admin | Updated: April 13, 2015 06:14 IST

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे

बापू बल्ौकर, पुणेगेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे. ती तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली आहे; मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमाच झाली नाही. फक्त इंदापूर तालुक्यात १00 टक्के वाटप झाले आहे. जिल्ह्यात जानेवारी वगळता दर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी धास्तावला आहे. दर महिन्यात तो पावसाचा सामना करीत उरलेले पीक कसेबसे वाचविण्याचा प्रयत्न करतो, तोच पुन्हा पाऊस पडत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ४ हजार २३४ हेक्टरवरील भात व ४५३.२६ हेक्टरवरील द्राक्षपिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर २८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानंतर आता १0 व ११ एप्रिल असे दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात अवकाळीने हैदोस घातला आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१४ रोजी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी वेल्हा, खेड, आंबेगाव, इंदापूर, बारामती तालुक्यांसाठी चार महिन्यांनंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २ लाख ४४ हजार ९१ लाख ८५0 रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.ही रक्कम ३० मार्च २0१५ रोजी प्रशासनाने तहसीलदारांच्या खात्यात जमाही केली आहे. मात्र, याचे अद्याप या तालुक्यात वाटपच झाले नाही. फक्त इंदापूर तालुक्याने ही रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.वेल्हेचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, हे अनुदान ३१ मार्च रोजी मंजूर झाल्याने तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे नंबर उपलब्ध नसल्याने हे अनुदान लॅप्स करून हेच अनुदान एप्रिल महिन्यात परत येणार आहे. ते आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असे सांगितले.खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे म्हणाले, की धनादेश बनविण्याचे काम सुरू असून, ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. ३१ मार्चला अनुदान खात्यात जमा झाल्याने ते परत जाणार नाही. बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण हे वैयक्तिक अडचणींमुळे बाहेर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वाटपाचे चेक तयार आहेत. मात्र, त्यांच्या सहीमुळे ते खात्यात जमा झाले नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. इंदापूरचे तहसीलदार संजय पावार यांनी मात्र आलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. ते म्हणाले, की मार्च २0१४ रोजी अवकाळीने मोठे नुकसान झाले होते. यावेळची भरपाई वाटप करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची बँक खाती घेतली होती. ती आमच्याकडे असल्याने ही रक्कम लगेच त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.